शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ४७ व्या वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST

वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास, २७०० चौरस किलोमीटर क्षेत्र, ५० वाघ, २२ छावे अनिल कडू परतवाडा (अमरावती) : वाघांसह वन्यजिवांच्या ...

वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास, २७०० चौरस किलोमीटर क्षेत्र, ५० वाघ, २२ छावे

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : वाघांसह वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनात अग्रेसर ठरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला सोमवारी ४६ वर्षे पूर्ण झाली. देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमधील एक सर्वात मोठा आणि महाराष्ट्रातील पहिला मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरला आहे. २२ फेब्रुवारी १९७४ ला अस्तित्वात आलेला हा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या प्रजननास व वास्तव्यास अनुकूल ठरला आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आज ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत. याव्यतिरिक्त २२ छावे आहेत. शंभर वाघांचा सांभाळ करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. व्याघ्र संवर्धनात स्थिरावलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर आहे. यात ३६१.२८ चौरस किलोमीटरचे गुगामल राष्ट्रीय उद्यान समाविष्ट आहे. एका वाघाला साधारणत: २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. या अनुषंगाने शंभरहून अधिक वाघ मेळघाटात वास्तव्य करू शकतात. मेळघाटातील नर, मादी आणि छावे विचारात घेता, सध्या मेळघाटात लहान-मोठे ७२ वाघ वास्तव्यास आहेत.

४६ वर्षाच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आणि जंगल सर्वोत्कृष्ट ठरले आहे. एनटीसीच्या मूल्यमापन समितीच्या निष्कर्षात हा व्याघ्र प्रकल्प व्हेरी गुड श्रेणीत आहे. बदलत्या परिस्थितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन व उपाययोजनाही बदलत आहेत. वाघ आणि वाघांच्या नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या परिणामकारक उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, व्याघ्र संवर्धन व संरक्षणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. पर्यटनाच्या अनुषंगानेही व्याघ्र प्रकल्प अग्रेसर ठरला असून, मध्य भारतातील पहिली हत्ती सफारी कोलकास येथे उपलब्ध आहे.

सायबर सेल

व्याघ्र प्रकल्पासाठी २०१३ मध्ये स्थापन झालेल्या वाईल्ड लाईफ क्राईम अँड सायबर सेल देशपातळीवरील पहिलाच प्रयोग आहे. देशपातळीवर जवळपास अडीचशे शिकारी, चोरट्यांना सायबर सेलने पकडून दिले. प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदा वनरक्षक आकाश सारडांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना आणि एकछत्री नियंत्रणास मान्यता मिळाली आहे.

स्मरणातील घटना

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह येथे लोकआग्रहास्तव भोला नामक हत्तीने १६ मार्च २००५ ला प्राण त्यागले होते. ४ ऑगस्ट २०१० ला जारिदा येथे अस्वलाच्या हल्ल्यात चार इसमांचा मृत्यू झाल्यानंतर या अस्वलाला एसआरपीएफ जवानांनी ७ ऑगस्ट २०१० ला गोळ्या घातल्या.

—————————————