शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महेंद्री जंगल आता संवर्धन राखीव क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव शासनाने मागविला होता. एवढेच नव्हे तर तत्त्वत: मान्यतादेखील दिली. परंतु, महेंद्री जंगलाचे वैभव, दुर्मीळ वनौषधी, वन्यजिवांची रेलचेल बघता, अभयारण्य नव्हे तर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून नावारूपास येणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाची १६ वी बैठक ४ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे.

ठळक मुद्देवरिष्ठांचे पत्र, मुख्य वनसंरक्षकांनी पाठविला नव्याने प्रस्ताव

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वरूड तालुक्यातील महेंद्री जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्याबाबत तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता महेंद्री अभयारण्य नव्हे, तर संवर्धन राखीव क्षेत्रासाठी नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला आहे. अमरावतीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना याबाबत प्रस्ताव पाठविण्याचे कळविले आहे. त्यामुळे येत्या काळात महेंद्रीचे जंगल संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून नावारूपास येणार आहे. महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव शासनाने मागविला होता. एवढेच नव्हे तर तत्त्वत: मान्यतादेखील दिली. परंतु, महेंद्री जंगलाचे वैभव, दुर्मीळ वनौषधी, वन्यजिवांची रेलचेल बघता, अभयारण्य नव्हे तर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून नावारूपास येणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाची १६ वी बैठक ४ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. या बैठकीत महेंद्री जंगल संवर्धन राखीव क्षेत्राबाबत चर्चा केली जाणार असल्याचे वनसंरक्षक (नियाेजन व व्यवस्थापन वन्यजीव) युवराज एस. यांनी २३ नोव्हेंबर रोजी पत्राद्धारे कळविले आहे.महेंद्री हे पाणी देणारे जंगल आहे. महेंद्री तलावाचे भविष्य याच जंगलावर अवलंबून आहे. या परिसरात नागठाणा तलाव, वाई तलाव, जामगाव तलाव, पंढरी तलाव, एकलविहिर तलाव, शेकदारी तलावांचा महेंद्री जंगलात समावेश आहे.जंगलात असणाऱ्या जैवविविधतेमुळे वन्यजीवप्रेमी या जंगलाचे संवर्धन होण्याची अपेक्षा अनेक वर्षांपासून बाळगून आहेत. त्यांच्या स्वप्नाची पूर्तता आता होईल. 

वनमंत्री घेणार आढावापर्यावरण, वने आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी महेंद्रीचे जंगल हे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत वनमंत्री संजय राठोड हे याबाबत आढावा घेणार आहेत. महेंद्री जंगलाचे वैशिष्ट्ये, वनसंपदा, जलस्त्रोत, वन्यजिवांचा वावर, क्षेत्रफळ याविषयी ना. राठोड माहिती जाणून घेतील.  त्याकरिताच नव्याने प्रस्ताव मागविला आहे. त्यामुळे महेंद्रीचे जंगल संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले जाईल, असे संकेत वन विभागाने दिले आहे. 

टॅग्स :forestजंगल