शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

Maharashtra Election 2019 : कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; मी कर्जमुक्त करणार - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:35 IST

अमरावतीमध्ये ८ पैकी ८ आमदार मला युतीचे हवे आहेत. जनतेतलाच माणूस जनतेचे नेतृत्व करतो त्याला प्रतिनिधी म्हणतात

अमरावती - शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीतर मी कर्जमुक्त करणार आहे. कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही. जसे मागेल त्याला शेततळे आपण दिले तसे जनावरांपासून शेती सुरक्षित ठेवण्यासाठी कुंपण दिले पाहिजे ते आपण देणार आहोत. हे अन्यायाविरुद्ध बंड, धनदांडग्यांच्या विरुद्ध बंड आहे. बंड हे असलंच पाहिजे शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यासाठी बंड केले होते असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमरावतीतील जाहीर सभेत केलं आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बंद हॉल मधली नाही तर आपण उघड्या मैदानात असणारी माणसे  आहोत. मी मॅच जिंकलेली आहे, माझी धावसंख्या ठरलेली आहे. मला विश्वास आहे की या एका सभेमध्ये संपूर्ण अमरावती मधील उमेदवार तुम्ही निवडून द्या. मागच्या वेळेला जरा गडबड झाली. संपूर्ण देशामध्ये भगवा असताना माझ्या अमरावतीमध्ये भगवा नाही याची मला खंत आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

तसेच अमरावतीमध्ये ८ पैकी ८ आमदार मला युतीचे हवे आहेत. जनतेतलाच माणूस जनतेचे नेतृत्व करतो त्याला प्रतिनिधी म्हणतात. भगव्याचे मावळे हे विकत घेतले जात नाही हे अमरावतीकरांनी सर्वांना दाखवायचे आहे. जिंकल्यानंतर मी याच मैदानात विजयी सभा घेणार आहे. अमरावतीला  स्वाभिमान आहे. इथे पैसा चालणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले. 

दरम्यान, बघतो, पाहतो, करतो असे बोलणारी शिवसेना नाही. जे बोलतो तो करतो अशी उद्धव आणि आदित्यची शिवसेना आहे. गॅस सिलेंडर हे अति वंचित लोकांना आपण देणार आहोत दिलेच पाहिजेत. मंदी  येते आहे रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी आपण जगवला पाहिजे तर देश जगणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधकातून युतीमध्ये आले कारण ते काम करण्यासाठी राजकारणात आले आहेत.  १० रुपयाचे शिवभोजन देणार आहे. १ रुपयांमध्ये गरीबांना प्राथमिक आरोग्य चाचण्या करून देणार. जी वचने मी तुम्हाला दिलेली आहेत त्याला मी वचनबध्द आहे. निवडणुकीनंतर मी पुन्हा अमरावतीमध्ये येणार आणि ही वचने पूर्ण करणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी लोकांना देत काँग्रेस पक्ष म्हणत होता की 370 कलम काढणार नाही अशा लोकांना आपण सत्ता देणार होतात का? असा सवालही उपस्थित लोकांना विचारला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसArticle 370कलम 370Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019