शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Bachhu Kadu: 'आधी खिसा कापून नंतर किराणा वाटणारे महाठग' बच्चू कडूंचा राणांवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 09:06 IST

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) एक लाख कुटुंबांमध्ये किराण्याचे वितरण करणार आहेत.

मुंबई - शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडूअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यातील वाद आता जिल्ह्याला परिचीत झाला आहे. त्यामुळे, या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच शाब्दीक धुसफूस पाहायला मिळते. आमदार कडू यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी, बच्चू कडू यांचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे, अशी बोचरी टीका राणा यांनी केली होती. आता राणा यांच्या दिवाळी किराणा वाटपावरुन बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला नाव न घेता चांगलंच सुनावलं आहे.  

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) एक लाख कुटुंबांमध्ये किराण्याचे वितरण करणार आहेत. अमरावती शहरासह जिल्ह्यातील विविध भागात गरिबांच्या घरी त्यांच्याकडून किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यावरुन, आमदार कडू यांनी टीका केली आहे. आधी खिशे कापायचे आणि नंतर किराणा वाटायचा, असे म्हणत कडू यांनी राणा दाम्पत्यांविरुद्ध बोचरी टीका केली. 

काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे, अशा महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवाल बच्चू कडूंनी विचारला आहे. यावेळी कोणाचेही नाव त्यांनी घेतले नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा रोक राणा दाम्पत्याकडे होता. 

डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या अघिकाराचं प:तन

गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

१ लाख कुटुंबांना किराणा वाटप

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मेळघाटातील गोर-गरीब आणि गरजूंच्या जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करत आहेत. मेळघाटातील १ लाख गरीब कुटुंबियांना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून  मोफत किराणा वाटप सुरू आहे. ‘किराणा किट पॅकिंगचे काम युद्धस्तरावर सुरू असून आदिवासीसंह अमरावतीतील १ लाख गरजू कुटुंबियांच्या घरी मोफत किराणा पोहचविण्यात येत आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूnavneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीRavi Ranaरवी राणा