शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

लोणीचा ऋषिबाबा प्रकल्प १४ वर्षांपासून तहानलेलाच

By admin | Updated: December 16, 2015 00:23 IST

आलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम गत १४ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे.

जलसंचयाऐवजी वाढली काटेरी झुडुपे : सिंचनापासून शेतकरी वंचितत्रिनयन मालपे लोणीआलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम गत १४ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे प्रकल्प तहानलेलाच आहे. या सिंचन प्रकल्पाचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल व शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ दफ्तरदिरंगाई आणि ठेकेदाराच्या लेटलतिफपणामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २००२ मध्ये लोणीनजीक आलोडा शिवारात लोणीलघु पाटबंधारे योजना (ऋषिबाबा प्रकल्प) च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याकरिता ३ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. ऋषिबाबा लघु सिंचन प्रकल्पामुळे लोणी आणि परिसरातील शेतीकरिता पूरक ठरणारा आहे. याकरिता ६४ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्राकरिता अधिग्रहीत करण्यात आली. या जमिनीच्या ८० टक्के शेतमालकांना २००४ मध्ये अनेकवेळा पाठपुरावा केल्याने शासनाने निर्णयानुसार मोबदला दिला. मात्र २० टक्के शेतकरी प्रकल्पग्रसांना अद्यापही मदत मिळाली नाही. वाढीव मोबदलासुध्दा बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना मिळाला नाही. या प्रकल्पाची महत्तम उंची ९१.७० मीटर असून भिंतीची लांबी एक हजार ४५० मीटर आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाझराचासुध्दा लाभ मिळणार आहे. यातून काढण्यात येणाऱ्या कालव्यामुळे लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे. हा प्रकल्प फायदेशिर असल्याने वरुड मोर्शीचे तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाने मंजूर केला होता. या प्रकल्पासून शेकडो हेक्टर जमिनीच्या सिंचनाकरिता लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले. या प्रकल्पाला पाणी कमी पडू नये म्हणून भविष्यातील नियोजन केले होते. यामध्ये वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कालव्यामधून बेनोडा येथील धवलगीरी नदीमध्य ेसोडून ते धवलगीरी नदीतून या प्रकल्पात सोडण्याचा बेत होता. परंतु सत्तांतरे झाल्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ते पूर्ण करण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले नाहीत तर गत पाच वर्षांपासून तालूक्यातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. यामुळे प्रकल्पाच्या किमतीमध्ये चौपट वाढ झाली. मात्र शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ अद्यापही मिळाला नाही. ऋषिबाबा प्रकल्पाचे कार्य गत १४ वर्षांपासून सुरू असून निधीअभावी थंडबस्त्यात आहे. आव्हरफ्लो आणि गेटचे काम शिल्लक आहे. परंतु येथे ेजलसंचयाऐवजी आता कोअरी झुडुपांनी जागा घेतली. ओव्हरफ्लो आणि भिंतीवर झाडेझुडुपे वाढल्याने त्याचीसुध्दा पतवारी घसरली आहे. त्यामुळे कालव्याची दुर्दशा झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा शासनाचा या प्रकल्पावर खर्च होऊनही अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.