शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

'नौटंकी करण्यात बच्चू कडू सुप्रसिद्ध, भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं त्यांचा धंदा'; रवी राणांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 12:19 IST

Bacchu Kadu : आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

Bacchu Kadu ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या पक्षाचाही उमेदवार मैदानात उतरवला आहे. गेल्या काही दिवसांत बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतानाच काल मात्र सायन्स कोअर मैदानातील सभेवरून चांगलाच राडा झाला. आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावरुन आता आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. 

'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

"राहुल गांधी आज दौऱ्यावर आहेत, त्यांची जिथे सभा होणार आहे ते मैदानही आम्ही बुक केले होते, पण हायप्रोफाइल कोण नेता आला की त्यांच्या सिक्युरीटी प्रमाणा मैदान द्यावे लागले, आम्ही ते मैदान त्यांना दिले. संविधानाचा आदर केला पाहिजे.  दोन दिवसापूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची तिथे सभा होणार होती तोही सभागृह आम्ही बुक केला होता, आम्हाला त्यांनी सांगितले की शरद पवार आणि ठाकरे यांच्या सिक्युरिटी दृष्टीने आम्हाला सभागृह पाहिजे आम्ही त्यांनाही दिले, त्यावेळी आम्ही त्याच बबल केला नाही, आम्ही त्याचा भांडवल केले नाही, भांडवल करणे आणि भांडवलातून सस्ती पब्लिसीटी करणे हा आता बच्चू कडू यांचा धंदा झाला आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. 

"त्यांनी जनतेसाठी काय केलं, कोणता उद्योग आणला, शेतकऱ्यांसाठी काय केलं. बच्चू कडू यांनी मला दिवाळी काळात तुरुंगात टाकलं. गरिबांचे संकट काय असते हे मला माहित आहे. अमरावतीची जनता त्यांना जाणते. सस्ती पब्लिसीटीसाठी देशाच्या गृहमंत्र्यांचा विरोध करणे, सभेचा विरोध करणे याचे भांडवल करणे यातून काहीही मिळणार नाही, असंही राणा म्हणाले. 

"अमरावती जिल्ह्यात दोन मंत्री होते, त्यावेळी जिल्ह्यात मोठे दंगे झाले. हिंदूंच्या घरावर दगडफेक झाले. उमेश कोल्हे हत्याकांड झाला. तेव्हा या मंत्र्यांनी तोंडाला लॉक लावला होता, यावर काहीही ते बोलले नाहीत. नवनीत राणा यांनी अमित शाह यांची भेट घेऊन हत्येचा तपास करण्याची विनंती केली, तेव्हापासून एनआयएने तपास सुरू केला. तेव्हा यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी पोलिसांना फाईल बंद करायला सांगितलं होतं, असा आरोपही रवी राणा यांनी केला.  

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBacchu Kaduबच्चू कडूlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४