शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

'नौटंकी करण्यात बच्चू कडू सुप्रसिद्ध, भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं त्यांचा धंदा'; रवी राणांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 12:19 IST

Bacchu Kadu : आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

Bacchu Kadu ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या पक्षाचाही उमेदवार मैदानात उतरवला आहे. गेल्या काही दिवसांत बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतानाच काल मात्र सायन्स कोअर मैदानातील सभेवरून चांगलाच राडा झाला. आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावरुन आता आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. 

'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

"राहुल गांधी आज दौऱ्यावर आहेत, त्यांची जिथे सभा होणार आहे ते मैदानही आम्ही बुक केले होते, पण हायप्रोफाइल कोण नेता आला की त्यांच्या सिक्युरीटी प्रमाणा मैदान द्यावे लागले, आम्ही ते मैदान त्यांना दिले. संविधानाचा आदर केला पाहिजे.  दोन दिवसापूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची तिथे सभा होणार होती तोही सभागृह आम्ही बुक केला होता, आम्हाला त्यांनी सांगितले की शरद पवार आणि ठाकरे यांच्या सिक्युरिटी दृष्टीने आम्हाला सभागृह पाहिजे आम्ही त्यांनाही दिले, त्यावेळी आम्ही त्याच बबल केला नाही, आम्ही त्याचा भांडवल केले नाही, भांडवल करणे आणि भांडवलातून सस्ती पब्लिसीटी करणे हा आता बच्चू कडू यांचा धंदा झाला आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. 

"त्यांनी जनतेसाठी काय केलं, कोणता उद्योग आणला, शेतकऱ्यांसाठी काय केलं. बच्चू कडू यांनी मला दिवाळी काळात तुरुंगात टाकलं. गरिबांचे संकट काय असते हे मला माहित आहे. अमरावतीची जनता त्यांना जाणते. सस्ती पब्लिसीटीसाठी देशाच्या गृहमंत्र्यांचा विरोध करणे, सभेचा विरोध करणे याचे भांडवल करणे यातून काहीही मिळणार नाही, असंही राणा म्हणाले. 

"अमरावती जिल्ह्यात दोन मंत्री होते, त्यावेळी जिल्ह्यात मोठे दंगे झाले. हिंदूंच्या घरावर दगडफेक झाले. उमेश कोल्हे हत्याकांड झाला. तेव्हा या मंत्र्यांनी तोंडाला लॉक लावला होता, यावर काहीही ते बोलले नाहीत. नवनीत राणा यांनी अमित शाह यांची भेट घेऊन हत्येचा तपास करण्याची विनंती केली, तेव्हापासून एनआयएने तपास सुरू केला. तेव्हा यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी पोलिसांना फाईल बंद करायला सांगितलं होतं, असा आरोपही रवी राणा यांनी केला.  

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBacchu Kaduबच्चू कडूlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४