शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Lok Sabha Election 2019; लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:13 PM

लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देशैलेश नवाल : दोन हजार केंद्रात १८,३०,५६१ मतदार बजावणार हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर व मेळघाट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात ९,३३,४४४ पुरुष, ८,८७,०८० महिला स्त्री व ३७ तृतीयपंथीय मतदार आहेत. ५१८९ दिव्यांग, २५३० सैन्य दलातील मतदार आहेत. ते २४ उमेदवारांचे भाग्य ठरवतील. दोन हजार मतदान केंद्रांसाठी ८९१६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ८९१ मनुष्यबळ राखीव आहेत. १८ सखी मतदार केंद्रे आहेत. या ठिकाणी निवडणूक अधिकारी व पोलीसदेखील महिलाच राहतील. ३७ संवेदनशील केंद्रांवर ३७ मायक्रो आॅब्झर्व्हर नेमले आहेत, तर एकूण ६१ मायक्रो आॅब्झर्व्हर नियुक्त आहेत. जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपल्यानंतर एसएसटी, फ्लार्इंग स्कॉड आदीद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत पाहणी करीत आहेत. या कालावधीत १८ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली तर आचारसंहिता उल्लंघनाबाबत आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहे. कुठेही संशय वाटल्यास व्हीडीओ कॅमेरा पथकाची नजर राहणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाच्या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन शैलेश नवाल यांनी केले आहे.ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून यावर मॉनिटरिंग होणार आहे. या निवडणुकीसाठी चार हजार बीयू, दोन हजार सीयू व दोन हजार व्हीव्हीपॅट लागणार आहेत. याव्यतिरिक्त ८३० बीयू, ४१५ सीयू व ४१५ व्हीव्हीपॅट राखीव आहे. कुठल्याही केंद्रावर यंत्र बंद झाले असल्यास, ते अवघ्या ३० मिनिटांत बदलणार असल्याचे शैलेश नवाल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती