शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

लॉकडाऊन इफेक्ट; हवेची गुणवत्ता सुधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 5:00 AM

सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आकडेवारी प्राप्त केली.

ठळक मुद्दे‘एएक्यूएम’चा अहवाल : प्रदूषणात घट, आरएसपीएमच्या प्रमाणातही कमी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीच्या तुलनेत यंदा रहिवासी, औद्योगिक व वाणिज्यिक क्षेत्रात प्रदूषणाचे पातळीत घट झाली आहे. एनओएक्स, एसओटू व आरएसपीएमच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याने महापालिका क्षेत्रात हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची बाब ‘एएक्यूएम’ (अ‍ॅम्बीएंन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग) च्या आकडेवारी व अहवालाअंती स्पष्ट झाले आहे. यंदा चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा हा परिणाम आहे. याविषयीचा अहवाल महापालिकेला सादर झालेला आहे.सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात नमूद केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आकडेवारी प्राप्त केली. त्याअनुषंगाने हा अहवाल तयार करून सभागृहासमोर ठेवण्यात आला होता.एएक्यूएमच्या वार्षिक वायुप्रदूषण अहवालानुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १३.०५ व एसओटूचे ११.१८ आढळले. हे प्रमाण प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे व आरएसपीएमचे प्रमाण ६९.६४ आढळले. हे प्रमाण अनुज्ञेय पातळी १०० पेक्षा कमी आढळले आहे. सन २०१८-१९ मध्ये हे प्रमाण ७४.७१ होते. औद्योगिक क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १३.८३ व एसओटूचे प्रमाण १२.२८ आढळले. प्रदूषण पातळीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाण ८५.८३ आढळले हे अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त असले तरी गतवर्षी हे प्रमाण १०८.९१ होते. व्यापारी क्षेत्रात एनओएक्सचे प्रमाण १४.७१ व एसओटूचे प्रमाण १३.४१ ऐवढे आहे. हे प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे.आरएसपीएमचे प्रमाण ९३.३० आहे, हे अनुज्ञेय प्रमाणापेक्षा जास्त असले तरी गतवर्षी असलेल्या ११८.७६ पेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.कारवाईचे अधिकार पोलिसांनाशहरातील ध्वनिप्रदूषणासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास कारवाईचे अधिकार पोलीस विभागाला आहेत. शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये अशी ५८१ शांतता क्षेत्रे घोषित केल्याची माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी दिली.महापालिका क्षेत्रात वार्षिक वायुप्रदूषण स्थितीरहिवासी क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ६५.५० म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी तसेच एनओएक्स १२.७० व एसओटूचे प्रमाण १२.१५ म्हणजेच अनुज्ञेय प्रमाण ८० पेक्षा कमी आहे.औद्योगिक क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण ८७.६० म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी तसेच एबओएक्स १२.४० व एसओटूचे प्रमाण १२.६८ हे अनुज्ञेय पातळी ८० पेक्षा कमी आहे.व्यापारी क्षेत्रात आरएसपीएमचे प्रमाण ८९.१५ म्हणजे अनुज्ञेय पातळीपेक्षा जास्त तसेच एनओएक्स ११.९० व एसओटूचे प्रमाण १२.०५ ही अनुज्ञेय पातळी ८० पेक्षा कमी आहे.घनकचरा अन् सांडपाणी व्यवस्थापनसुकळी कंपोस्ट डेपो, अकोली बायपास व कोंडेश्वर मार्गावर बडनेरा येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी ३८ कोटींचा निधी अपेक्षित आहे. शहरातील दैंनदिन घनकचऱ्यावर येथे विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण