शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
3
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
4
BMC Elections: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
5
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
7
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
8
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
9
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
10
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
11
सावधान! 'हॅप्पी न्यू इयर' म्हणण्यापूर्वी १० वेळा विचार करा; एका क्लिकमुळे बँक खातं होईल रिकामं
12
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
13
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
14
Pisces Yearly Horoscope 2026: मीन राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रेमाचे आणि प्रगतीचे वर्ष; परदेश प्रवासासह उत्पन्नात होणार मोठी वाढ!
15
पत्नी असावी तर अशी! BMC निवडणूक लढवणाऱ्या समाधान सरवणकरांना तेजस्विनीची साथ, अभिनेत्रीचं होतंय कौतुक
16
‘मुंबई मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने उमेदवार उतरवणार’, सुनिल तटकरे यांची घोषणा
17
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
18
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
19
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
20
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:27 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला.

इंदल चव्हाण

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख लाभलेल्या या जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा १ जून ते सप्टेंबरपर्यंत अपेक्षित ७७७.९ मिमीच्या तुलनेत १२ जुलैपर्यंत सरासरी २५१.४ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ आहे. वार्षिक २२.१ टक्केवारी आहे. यात अमरावती जिल्ह्यात सरासरी २५३ मिमीपैकी १५७ मिमी, अकोला २२४.८ पैकी १७५.५ मिमी, यवतमाळ २९५.१ पैकी १२६.५ मिमी, बुलडाणा २२०.४ पैकी २१४.३ मिमी, वाशीम २६३.९ पैकी १५९.५ मिलीमीटरच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ इतकी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याने सरासरी गाठली असून, १४ पैकी सात तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांवर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यांनी सरासरी गाठली असून, एकूण सातपैकी सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी एकाही तालुक्याने सरासरी गाठली नसून, केवळ चार तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मानोरा माघारला असून, सर्व तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याची टक्केवारी ६०.४ एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असून सात तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची टक्केवारी ९७.२ इतकी आहे.

विभागातील 'या' तालुक्यांत अल्प पावसाची नोंद

तालुके          मिमी पाऊस       टक्के

भातकुली           ९४.८             ३९ तिवसा               ११८.४           ४९.५मोर्शी                 १२१,१           ४८.३वरूड               १०३.५           ३५.९दर्यापूर              ९७.९            ४५.८अंजनगाव सुर्जी    ८५.४         ४६.३मूर्तिजापूर          ८५.८           ३४.८यवतमाळ          ९४.७           ३१बाभूळगाव        ११.४             ३६.५कळंब             १०३.३            ३३.८दारव्हा            ११७.५           ४२.८दिग्रस             १००                ३५.८पुसद              १३२.२            ४९.६उमरखेड       १००.४            ३४.२महागाव         १०३.६            ३७.८केळापूर         ११६.१            ३७.३घाटंजी           १३५.९           ४३राळेगाव        १४५.६           ४६.१झरी जामणी  १३१.८             ४१.९मानोरा          १२६.१             ४९.७देऊळगाव राजा    ११०.२      ४७.६

आपत्तीजनक स्थितीत शेतकऱ्यांना मदतीवर मंथन  

विभागातील काही तालुक्यांची पावसाची स्थिती बिकट आहे. याबाबत प्रशासन दखलपात्र असून, अवघ्या आठ दिवसांत पावसाची स्थितीत सुधारणा न झाल्यास उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी यथोचित मदत करण्यात येईल. उपलब्ध पाणीसाठ्याचे देखील नियोजनावर मंथन केले जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊसYavatmalयवतमाळbuldhanaबुलडाणाwashimवाशिम