शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पश्चिम विदर्भातील २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 12:27 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला.अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला.

इंदल चव्हाण

अमरावती - पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५६ तालुक्यांचा समावेश असून, यंदा २२ तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. यात सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख लाभलेल्या या जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदा १ जून ते सप्टेंबरपर्यंत अपेक्षित ७७७.९ मिमीच्या तुलनेत १२ जुलैपर्यंत सरासरी २५१.४ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात १६६.६ मिमी एवढाच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ आहे. वार्षिक २२.१ टक्केवारी आहे. यात अमरावती जिल्ह्यात सरासरी २५३ मिमीपैकी १५७ मिमी, अकोला २२४.८ पैकी १७५.५ मिमी, यवतमाळ २९५.१ पैकी १२६.५ मिमी, बुलडाणा २२०.४ पैकी २१४.३ मिमी, वाशीम २६३.९ पैकी १५९.५ मिलीमीटरच पाऊस झाला. याची टक्केवारी ६८.१ इतकी आहे. 

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याने सरासरी गाठली असून, १४ पैकी सात तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांवर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तालुक्यांनी सरासरी गाठली असून, एकूण सातपैकी सहा तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी एकाही तालुक्याने सरासरी गाठली नसून, केवळ चार तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी मानोरा माघारला असून, सर्व तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याची टक्केवारी ६०.४ एवढी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असून सात तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्क्यांपैक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याची पावसाची टक्केवारी ९७.२ इतकी आहे.

विभागातील 'या' तालुक्यांत अल्प पावसाची नोंद

तालुके          मिमी पाऊस       टक्के

भातकुली           ९४.८             ३९ तिवसा               ११८.४           ४९.५मोर्शी                 १२१,१           ४८.३वरूड               १०३.५           ३५.९दर्यापूर              ९७.९            ४५.८अंजनगाव सुर्जी    ८५.४         ४६.३मूर्तिजापूर          ८५.८           ३४.८यवतमाळ          ९४.७           ३१बाभूळगाव        ११.४             ३६.५कळंब             १०३.३            ३३.८दारव्हा            ११७.५           ४२.८दिग्रस             १००                ३५.८पुसद              १३२.२            ४९.६उमरखेड       १००.४            ३४.२महागाव         १०३.६            ३७.८केळापूर         ११६.१            ३७.३घाटंजी           १३५.९           ४३राळेगाव        १४५.६           ४६.१झरी जामणी  १३१.८             ४१.९मानोरा          १२६.१             ४९.७देऊळगाव राजा    ११०.२      ४७.६

आपत्तीजनक स्थितीत शेतकऱ्यांना मदतीवर मंथन  

विभागातील काही तालुक्यांची पावसाची स्थिती बिकट आहे. याबाबत प्रशासन दखलपात्र असून, अवघ्या आठ दिवसांत पावसाची स्थितीत सुधारणा न झाल्यास उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी यथोचित मदत करण्यात येईल. उपलब्ध पाणीसाठ्याचे देखील नियोजनावर मंथन केले जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीRainपाऊसYavatmalयवतमाळbuldhanaबुलडाणाwashimवाशिम