शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भूजलात १२ फुटांपर्यंत कमी, ४५५ गावांत पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:33 IST

यंदा सरासरीच्या २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याने भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात लघु पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत १२ फुटांपर्यंत कमी आल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’चा शासनाला अहवाल : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी कार्यवाही आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सरासरीच्या २० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाल्याने भूगर्भाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात लघु पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत १२ फुटांपर्यंत कमी आल्याचे धक्कादायक वास्तव आहे. संभवत: यंदा किमान ४५५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आलेले आहे. यासाठी संभाव्य टंचाईच्या गावांत पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यासाठी आतापासूनच कार्यवाही करणे आवश्यक झालेले आहे.जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बेसॉल्ट खडकाने व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे. यामध्ये १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. मात्र, यंदा अल्यप पर्जन्यमानामुळे ही विपरीत स्थिती जिल्ह्यावर ओढावली असल्याने स्त्रोत बळकटीकरणासोबत अस्तित्वातील पाणीपुरवठा साधनांची देखभाल दुरूस्तीदेखील तेवढीच महत्वाची आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातीळ गावे डोंगराळ भागात आहेत. तेथील भूस्तराची जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट येत आहे. यंदा मेळघाटात पाऊसदेखील कमी झाल्याने जानेवारीपासूनच पाणीटंचार्ईची झळ पोहोचणार आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व भातकुली तालुक्याच्या काही भागात यंदा भीषण पाणीटंचार्ई राहणार आहे.जिल्ह्यातील नऊ लघुपाणलोट क्षेत्रातील भूजल पातळीमध्ये २ ते ३ मीटरपर्यंत तूट आढळून आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६८ गावांना, तसेच सात तालुक्यातील ९ लघुपाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये ३ ते ४ मीटरपर्यंत तूट आढळून आल्याने जिल्ह्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ९५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. चांदूर बाजार तालुक्यातील गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या ठिकाणी पाण्याचा साठा सध्या उपलब्ध आहे.मात्र, भूजल पातळी खोल गेल्याने या तालुक्यातही पाणीटंचाईचे सावट आहे. जिल्ह्यातील काही भागात भौगोलिक व भूशास्त्रीय परिस्थितीमुळे तसेच रबी पिकांसाठी होणाऱ्या अमर्याद उपश्यामुळे भूजलातील पाण्याच्या पातळीत कमी कालावधीतच कमी येण्याची शक्यता आहे.वरूड, मोर्शी तालुक्यातनवीन विहिरींसह उपशावर बंदीवरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसिढत पाणलोट क्षेत्र असल्यामुळे व बारमाही ओलीतक्षेत्र जास्त असल्यामुळे विहिरी व सिंचन विहिरींद्वारे भुजलाचा उपसा फार मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ नुसार भुजल उपश्यावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे व याच भागात अधिनियम आठ (१) मधील तरतुदीनुसार बंदी घालण्याची शिफारस भूजल सर्वेक्षण विभागाने केली आहे.पाणीटंचाई : कालावधी व गावेपाणीटंचाईच्या पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पाणलोट क्षेत्रात अंतर्भूत आमरावती, धारणी, भातकुली, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, मोर्शी व वरूड तालुक्यामध्ये ९५ गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आहे.जानेवारी ते मार्च या कालावधीत अमरावती, भातकुली, चांदूर बाजार दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे, तिवसा, अंजनगाव सुर्जी व वरूड तालुक्यात ६८ गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे.एप्रिल ते जून या कालावधीत अमरावती, धारणी, चिखलदरा, अचलपूर, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरूड व तिवसा या तालुक्यातील ३०२ गावांत पाणीटंचाई राहील.यंदा भूजल पूनर्भरण झालेले नाही. गत पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. कलम २५ नुसार संभाव्य गावांमध्ये पाणीटंचाई घोषित करण्याची संदर्भात माहिती देण्यात आली.- विजय कराड, उपसंचालक, जीएसडीए