‘लेकीं’चाच वरचष्मा!

By Admin | Updated: June 17, 2014 23:57 IST2014-06-17T23:57:10+5:302014-06-17T23:57:10+5:30

बारावीच्या पाठोपाठ घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालांमध्येही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली. निकालाची एकूण टक्केवारी लक्षात घेता मुलांच्या तुलनेत मुलींना मिळालेले यश लक्षणीय आहे.

'Lekhi' is the supreme! | ‘लेकीं’चाच वरचष्मा!

‘लेकीं’चाच वरचष्मा!

अमरावती : बारावीच्या पाठोपाठ घोषित झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालांमध्येही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली. निकालाची एकूण टक्केवारी लक्षात घेता मुलांच्या तुलनेत मुलींना मिळालेले यश लक्षणीय आहे. जिल्ह्यातील उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८६.५१ इतकी आहे. गतवर्षी सुध्दा ८४.९० टक्क्यांसह मुलीच आघाडीवर होत्या, हे विशेष.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वीचा निकाल मंगळवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला. यामध्ये यंदाही जिल्ह्यात मुलींनीच शिखर गाठले. परीक्षेमध्ये ७८.७३ टक्के मुले तर ८६.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासूनच्या इयत्ता दहावी व बारावीच्या निकालांकडे नजर टाकली असता मुलींनी मिळविलेले देदिप्यमान यश डोळ्यांत भरण्यासारखे आहे. शैक्षणिक क्षेत्रात मुलींचे वर्चस्व सुखावह आहे. गेल्यावर्षी अमरावती जिल्ह्याचा निकाल ७६.२३ टक्के निकाल लागला होता. त्यावेळी विभागात १३ लाख २० हजार विद्यार्थी नियमीत व पुनर्परिक्षार्थींनी परीक्षा दिली होती. यामध्ये ७३.४० टक्के मुले तर ७९.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. या आकडेवारीहून मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत मुलीनीच बाजी मारली होती. यावर्षी सुध्दा मुलींनीच दहावीचा गड सर केला आहे. अमरावती जिल्ह्यातील ६५६ शाळांमधून ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये २२ हजार २०१ मुले तर २१ हजार २७२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Web Title: 'Lekhi' is the supreme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.