शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यातील तलाव, प्रकल्पस्थळाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

अप्पर वर्धा प्रकल्पस्थळी नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर मोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण व पर्यटन स्थळ म्हणून गणल्या ...

अप्पर वर्धा प्रकल्पस्थळी नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर

मोर्शी : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण व पर्यटन स्थळ म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे. अगदी धरणाच्या प्रवेशद्वारापासून ते संपूर्ण परिसरात बाराही महिने सुरक्षारक्षक, पाटबंधारे विभागाचे किंवा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी नजरेस पडत नाहीत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नजरेस पडत नसल्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरण हे सन १९९३ साली पूर्णत्वास गेले असून, या धरणात ६७८.२७ दलघमी पाणी साठवणुकीची क्षमता आहे. अमरावती शहर तसेच मोर्शी, वरूड, नांदगाव पेठ, बडनेरा या गावांना व बडनेरा रेल्वे स्टेशनला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हिवरखेड व ११ खेडे, लोणी व १४ खेडे, मोर्शी तालुक्यातील ७० गाव पाणीपुरवठा योजना, आष्टी, पेठ अहमदपूर व पांढुर्ण्याला पाणीपुरवठा ७७.३२९ दलघमी याव्यतिरिक्त अमरावती, नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीकरिता २४.७३५ दलघमी व सोफिया औष्णिक प्रकल्पाकरिता १२३.५२ दलघमी आरक्षित आहे. या धरणावर १ लक्ष ४ हजार ४०४ हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. कालव्यांच्या माध्यमातून ८३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. अशा या समृद्ध प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रावर नेहमीच प्रेमीयुगुलांचा बिनधास्त वावर असतो. दररोज शेकडो पर्यटक प्रतिबंधित क्षेत्रात चक्क धरणात उतरून आपला जीव धोक्यात घालून फोटोसेशन करताना पाहायला मिळतात. वास्तविक या परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. एवढेच नाही तर दारूच्या पार्ट्यासुद्धा धरण परिसरात रंगत असतात. अप्पर वर्धा धरणाच्या भिंतीवर प्रकाश व्यवस्था नाही. भिंतीवरील गेटसुद्धा नेहमी खुले असतात. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील गार्डन परिसर नेस्तनाबूत झाले आहे.