शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती घटली

By जितेंद्र दखने | Updated: April 2, 2024 22:17 IST

१,१३० कामावर केवळ ९ हजार ८२६ मजूर

अमरावती: जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३४४ ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १ हजार १३० कामे सुरू आहेत. या कामावर २ एप्रिल रोजी ९ हजार ८२६ मजुरांची उपस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे आटोपली आहे. मात्र, अशातच दुसरीकडे रोहयोवरील मजुरांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, वृक्षारोपण, रोपवाटिका यासह विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग, ग्रामपंचायत, कृषिविभाग, सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या वतीने मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या वृक्षलागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, वैयक्तिक वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, रस्ते, शेततळे, फळबाग लागवड, शोषखड्डे, गांडूळ खत निर्माती, घरकूल, पेव्हर ब्लॉक, शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा शौचालय, शाळा संरक्षक भिंत, शाळा परिसरात काँक्रीट नाला बांधकाम, शेततळी, रस्ते, रोपवाटिका, रेशीम उद्योग अशी कामे करण्यात येत आहेत. मात्र, रोहयोच्या कामावरील हजारो मजुरांच्या मजुरीचा मोबदला गत तीन महिन्यांपासून मिळाला नसल्याने मजुरांनीही रोहयोच्या कामावर पाठ फिरविली आहे.रोजगाराची हमी देणारी रोजगार हमी योजनासन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनेची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते.तालुका - कामे - मजूर उपस्थितीअचलपूर - ९३ - ८३९अमरावती - ८२ - ५०७अंजनगाव सुजी - २३ - १२६भातकुली - १४ - ९६चांदूर रेल्वे - ३२ - १४१चांदूर बाजार - ८२ - ४९३चिखलदरा - १८४ - २,६०५दर्यापूर - ६७ - ३१७धामनगांव रेल्वे - ३७ - २२५धारणी - १२६ - १,३३६मोर्शी - ६९ - १,१११नांदगाव खंडेश्वर - ९२ - ४६९तिवसा - ४७ - ३४७वरुड - १८२ - १,२१४मार्च महिन्यात होती १ लाखावर मजूर उपस्थितीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर गत ६ मार्चपर्यंत जिल्हाभरात ५ हजार ५६९ कामावर सुमारे १ लाख ४६९ एवढे मजूर उपस्थित होते. होळीपासून मात्र रोहयोवरील मजुरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. आजघडीला ही मजूर उपस्थित १० हजारांच्या आत असून कामांची संख्या १,१३० एवढीच आहे. येत्या १० एप्रिलनंतर रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती व कामांची संख्याही वाढण्याची शक्यता रोहयो विभागाकडून वर्तविली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध आहे. होळी सणामुळे कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या १० एप्रिलनंतर राेजगार हमी योजनेच्या कामे व मजूर उपस्थिती वाढेल.- श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ (रोहयो)

टॅग्स :Amravatiअमरावती