शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

जिल्ह्यात रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती घटली

By जितेंद्र दखने | Updated: April 2, 2024 22:17 IST

१,१३० कामावर केवळ ९ हजार ८२६ मजूर

अमरावती: जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३४४ ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १ हजार १३० कामे सुरू आहेत. या कामावर २ एप्रिल रोजी ९ हजार ८२६ मजुरांची उपस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे आटोपली आहे. मात्र, अशातच दुसरीकडे रोहयोवरील मजुरांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, वृक्षारोपण, रोपवाटिका यासह विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग, ग्रामपंचायत, कृषिविभाग, सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या वतीने मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या वृक्षलागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, वैयक्तिक वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, रस्ते, शेततळे, फळबाग लागवड, शोषखड्डे, गांडूळ खत निर्माती, घरकूल, पेव्हर ब्लॉक, शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा शौचालय, शाळा संरक्षक भिंत, शाळा परिसरात काँक्रीट नाला बांधकाम, शेततळी, रस्ते, रोपवाटिका, रेशीम उद्योग अशी कामे करण्यात येत आहेत. मात्र, रोहयोच्या कामावरील हजारो मजुरांच्या मजुरीचा मोबदला गत तीन महिन्यांपासून मिळाला नसल्याने मजुरांनीही रोहयोच्या कामावर पाठ फिरविली आहे.रोजगाराची हमी देणारी रोजगार हमी योजनासन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनेची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते.तालुका - कामे - मजूर उपस्थितीअचलपूर - ९३ - ८३९अमरावती - ८२ - ५०७अंजनगाव सुजी - २३ - १२६भातकुली - १४ - ९६चांदूर रेल्वे - ३२ - १४१चांदूर बाजार - ८२ - ४९३चिखलदरा - १८४ - २,६०५दर्यापूर - ६७ - ३१७धामनगांव रेल्वे - ३७ - २२५धारणी - १२६ - १,३३६मोर्शी - ६९ - १,१११नांदगाव खंडेश्वर - ९२ - ४६९तिवसा - ४७ - ३४७वरुड - १८२ - १,२१४मार्च महिन्यात होती १ लाखावर मजूर उपस्थितीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर गत ६ मार्चपर्यंत जिल्हाभरात ५ हजार ५६९ कामावर सुमारे १ लाख ४६९ एवढे मजूर उपस्थित होते. होळीपासून मात्र रोहयोवरील मजुरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. आजघडीला ही मजूर उपस्थित १० हजारांच्या आत असून कामांची संख्या १,१३० एवढीच आहे. येत्या १० एप्रिलनंतर रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती व कामांची संख्याही वाढण्याची शक्यता रोहयो विभागाकडून वर्तविली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध आहे. होळी सणामुळे कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या १० एप्रिलनंतर राेजगार हमी योजनेच्या कामे व मजूर उपस्थिती वाढेल.- श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ (रोहयो)

टॅग्स :Amravatiअमरावती