शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती घटली

By जितेंद्र दखने | Updated: April 2, 2024 22:17 IST

१,१३० कामावर केवळ ९ हजार ८२६ मजूर

अमरावती: जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३४४ ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १ हजार १३० कामे सुरू आहेत. या कामावर २ एप्रिल रोजी ९ हजार ८२६ मजुरांची उपस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे आटोपली आहे. मात्र, अशातच दुसरीकडे रोहयोवरील मजुरांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, वृक्षारोपण, रोपवाटिका यासह विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग, ग्रामपंचायत, कृषिविभाग, सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या वतीने मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या वृक्षलागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, वैयक्तिक वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, रस्ते, शेततळे, फळबाग लागवड, शोषखड्डे, गांडूळ खत निर्माती, घरकूल, पेव्हर ब्लॉक, शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा शौचालय, शाळा संरक्षक भिंत, शाळा परिसरात काँक्रीट नाला बांधकाम, शेततळी, रस्ते, रोपवाटिका, रेशीम उद्योग अशी कामे करण्यात येत आहेत. मात्र, रोहयोच्या कामावरील हजारो मजुरांच्या मजुरीचा मोबदला गत तीन महिन्यांपासून मिळाला नसल्याने मजुरांनीही रोहयोच्या कामावर पाठ फिरविली आहे.रोजगाराची हमी देणारी रोजगार हमी योजनासन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनेची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते.तालुका - कामे - मजूर उपस्थितीअचलपूर - ९३ - ८३९अमरावती - ८२ - ५०७अंजनगाव सुजी - २३ - १२६भातकुली - १४ - ९६चांदूर रेल्वे - ३२ - १४१चांदूर बाजार - ८२ - ४९३चिखलदरा - १८४ - २,६०५दर्यापूर - ६७ - ३१७धामनगांव रेल्वे - ३७ - २२५धारणी - १२६ - १,३३६मोर्शी - ६९ - १,१११नांदगाव खंडेश्वर - ९२ - ४६९तिवसा - ४७ - ३४७वरुड - १८२ - १,२१४मार्च महिन्यात होती १ लाखावर मजूर उपस्थितीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर गत ६ मार्चपर्यंत जिल्हाभरात ५ हजार ५६९ कामावर सुमारे १ लाख ४६९ एवढे मजूर उपस्थित होते. होळीपासून मात्र रोहयोवरील मजुरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. आजघडीला ही मजूर उपस्थित १० हजारांच्या आत असून कामांची संख्या १,१३० एवढीच आहे. येत्या १० एप्रिलनंतर रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती व कामांची संख्याही वाढण्याची शक्यता रोहयो विभागाकडून वर्तविली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध आहे. होळी सणामुळे कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या १० एप्रिलनंतर राेजगार हमी योजनेच्या कामे व मजूर उपस्थिती वाढेल.- श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ (रोहयो)

टॅग्स :Amravatiअमरावती