शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कांद्रीबाबा मंदिर परिसरात चूल तर पेटणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:33 IST

कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआज तारूबांद्यात आंदोलन : समस्त आदिवासी बांधवांचा वनविभागाला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गुगामल वन्यजीव विभागांतर्गत तारूबांदा वनपरिक्षेत्रात गावापासून दोन किमी अंतरावर कांद्रीबाबा मंदिर हे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असल्याने येथे आदिवासींना प्रवेशाला बंदी होती.परिसरातील ग्रामवासीयांच्या भावना लक्षात घेऊन तारुबांदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मंदिरावर जाण्याची बंदी उठवली. परंतु, परिसराला धोका असल्याने चूल पेटवू नका, असे सूचविले. आदिवासी बांधवांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रस्ताव धुडकावून लावत ८ जूनला मंदिर परिसरात महाप्रसादाकरिता चूल पेटविणार असल्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी लेखी पत्रातून दिला होता.वनविभाग व आदिवासी बांधव यांच्यात संघर्ष उसळून अनुचित प्रकार घडू नये, याकरिता धारणीचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, कॉन्स्टेबल अनिल झारेकर, नंदू पाटमासे हे मध्यस्थी करीत आहेत. या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. मोरे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुंदर कासदेकर आणि तारुबांदा, पाटकहू, भिरोजा, केशरपूर येथील नागरिक यांच्या उपस्थितीत तारूबांदा येथे या मुद्द्यावर समेटासाठी गुरुवारी रात्री ८ वाजता बैठक बोलावण्यात आली होती.कांद्रीबाबा मंदिर हे कोअर क्षेत्रात नसून, बफर क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यावर गावकºयांचा अधिकार आहे. तेथे आदिवासी पूजाअर्चा करतात व महाप्रसाद करण्यासाठी चूल पेटवितात. वनविभागाने आमच्या भावनांशी न खेळता पूर्वापार परंपरा पाळाव्यात, अशा भावना रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीला उपस्थित आदिवासींनी व्यक्त केल्या. मंदिर परिसरात शनिवारी आदिवासी बांधव चूल पेटवून स्वयंपाक करणार आहेत. त्यामधे वनविभागाने अडथळा केल्यास परिणामांची जबाबदारी स्वीकारावी, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.दरम्यान, आदिवासींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तूर्तास सावध पवित्रा घेतला आहे. आदिवासींसोबत गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारीदेखील काहीही बोलले नाहीत. पोलीस प्रशासनालाही वनविभागाच्यावतीने काहीही निर्देश नसल्याची माहिती आहे.पंधरवड्यापासून आदिवासींमध्ये धुमसत असलेल्या रोषासंदर्भात आदिवासी बांधवांनी लेखी निवेदन दिले व आंदोलनाची पत्रके काढली. तरीसुद्धा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वनविभागातील अधिकाºयांनी दखल घेतली नाही वा गावात येऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली नाही. यामुळे आदिवासी बांधवांची अधिकाºयांना काळजी नसल्याचा सूर सर्वत्र उमटत आहे.का दुखावल्या भावना?कांद्रीबाबा मंदिर परिसरात १८ मे रोजी एका आदिवासी बांधवाकडील पूजा आटोपल्यानंतर स्वयंपाकाच्या बेताने दुपारी 12 वाजता चूल पेटविण्यात आली. तेथे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवंसरक्षक शिवकुमार व त्यांचे कर्मचारी पोहचले. त्यानी अन्न शिजत असलेल्या चुलीतील जळती लाकडे पाणी टाकून विझविली. आदिवासी बांधवाना तेथून हाकलून लावले.आदिवासी बांधव शनिवारी मंदिर परिसरात पूजाअर्चा करून महाप्रसादाकरिता चूल पेटवतील. वनविभागाने बाधा आणल्यास होणाºया परिणामांना ते जबाबदार राहतील.- सुंदर कासदेकर, अध्यक्षवनव्यवस्थापन समितीआदिवासी बांधव व वनविभागाचा वारंवार समन्वय घडवून आणला. त्यात त्यांचे समाधान झाले नसल्याने शनिवारी आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यांना शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- विलास कुलकर्णीपोलीस निरीक्षक, धारणी

टॅग्स :Policeपोलिस