शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कांद्रीबाबा मंदिर परिसरात चूल तर पेटणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:33 IST

कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआज तारूबांद्यात आंदोलन : समस्त आदिवासी बांधवांचा वनविभागाला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गुगामल वन्यजीव विभागांतर्गत तारूबांदा वनपरिक्षेत्रात गावापासून दोन किमी अंतरावर कांद्रीबाबा मंदिर हे आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. वनविभागाच्या अखत्यारीत असल्याने येथे आदिवासींना प्रवेशाला बंदी होती.परिसरातील ग्रामवासीयांच्या भावना लक्षात घेऊन तारुबांदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मंदिरावर जाण्याची बंदी उठवली. परंतु, परिसराला धोका असल्याने चूल पेटवू नका, असे सूचविले. आदिवासी बांधवांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रस्ताव धुडकावून लावत ८ जूनला मंदिर परिसरात महाप्रसादाकरिता चूल पेटविणार असल्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी लेखी पत्रातून दिला होता.वनविभाग व आदिवासी बांधव यांच्यात संघर्ष उसळून अनुचित प्रकार घडू नये, याकरिता धारणीचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, कॉन्स्टेबल अनिल झारेकर, नंदू पाटमासे हे मध्यस्थी करीत आहेत. या दृष्टीने वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. मोरे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुंदर कासदेकर आणि तारुबांदा, पाटकहू, भिरोजा, केशरपूर येथील नागरिक यांच्या उपस्थितीत तारूबांदा येथे या मुद्द्यावर समेटासाठी गुरुवारी रात्री ८ वाजता बैठक बोलावण्यात आली होती.कांद्रीबाबा मंदिर हे कोअर क्षेत्रात नसून, बफर क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यावर गावकºयांचा अधिकार आहे. तेथे आदिवासी पूजाअर्चा करतात व महाप्रसाद करण्यासाठी चूल पेटवितात. वनविभागाने आमच्या भावनांशी न खेळता पूर्वापार परंपरा पाळाव्यात, अशा भावना रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीला उपस्थित आदिवासींनी व्यक्त केल्या. मंदिर परिसरात शनिवारी आदिवासी बांधव चूल पेटवून स्वयंपाक करणार आहेत. त्यामधे वनविभागाने अडथळा केल्यास परिणामांची जबाबदारी स्वीकारावी, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला.दरम्यान, आदिवासींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तूर्तास सावध पवित्रा घेतला आहे. आदिवासींसोबत गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीदरम्यान उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारीदेखील काहीही बोलले नाहीत. पोलीस प्रशासनालाही वनविभागाच्यावतीने काहीही निर्देश नसल्याची माहिती आहे.पंधरवड्यापासून आदिवासींमध्ये धुमसत असलेल्या रोषासंदर्भात आदिवासी बांधवांनी लेखी निवेदन दिले व आंदोलनाची पत्रके काढली. तरीसुद्धा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वनविभागातील अधिकाºयांनी दखल घेतली नाही वा गावात येऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली नाही. यामुळे आदिवासी बांधवांची अधिकाºयांना काळजी नसल्याचा सूर सर्वत्र उमटत आहे.का दुखावल्या भावना?कांद्रीबाबा मंदिर परिसरात १८ मे रोजी एका आदिवासी बांधवाकडील पूजा आटोपल्यानंतर स्वयंपाकाच्या बेताने दुपारी 12 वाजता चूल पेटविण्यात आली. तेथे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवंसरक्षक शिवकुमार व त्यांचे कर्मचारी पोहचले. त्यानी अन्न शिजत असलेल्या चुलीतील जळती लाकडे पाणी टाकून विझविली. आदिवासी बांधवाना तेथून हाकलून लावले.आदिवासी बांधव शनिवारी मंदिर परिसरात पूजाअर्चा करून महाप्रसादाकरिता चूल पेटवतील. वनविभागाने बाधा आणल्यास होणाºया परिणामांना ते जबाबदार राहतील.- सुंदर कासदेकर, अध्यक्षवनव्यवस्थापन समितीआदिवासी बांधव व वनविभागाचा वारंवार समन्वय घडवून आणला. त्यात त्यांचे समाधान झाले नसल्याने शनिवारी आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यांना शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- विलास कुलकर्णीपोलीस निरीक्षक, धारणी

टॅग्स :Policeपोलिस