शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 17:57 IST

Amravati : माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरच आहे काय...? असा संतप्त सवाल उपस्थित करून विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाणी पुसल्याचे ताशेरे माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ओढले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत वर्ष २०२४-२५ करिता सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका बाजूने विद्यमान सरकारला टेकू दिलेले आंध्र प्रदेश व बिहारवर प्रचंड निधीचा वर्षाव करण्यात आलेला आहे. याउलट केंद्रीय करांमध्ये सर्वाधिक वाटा देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाने पुसली. यावर 'कोण म्हणतो काहीच नाही..?' असा कोडगा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला. वस्तुतः महाराष्ट्रातील केवळ मुंबई, पुणेनागपूर येथील मेट्रो प्रकल्प, मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) नागपूर मेट्रो, नागपूर नाग नदी प्रकल्प, पुणे मेट्रो, पुणे मुळा-मुठा संवर्धन प्रकल्प यांना वगळता विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राला कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

विदर्भासाठी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला फुटकी कवडीसुद्धा दिली नाही. शेतकऱ्यांसाठी साधे पॅकेज तर सोडा, याबद्दल अवाक्षरही अर्थसंकल्पात नाही. याऊलट मुंबई, पुणे, नागपुरातील प्रकल्पांकरिता साधारणतः ५३३१ कोटी रुपये तर याउलट विदर्भ, मराठवाडा येथील सिंचन प्रकल्पांसाठी केवळ ६०० कोटींची तरतूद केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या सिंचनाचा अनुशेष अद्यापही भरून निघालेला नसताना किमान एकरकमी ५००० कोटी रुपये तरतूद यावर करणे अपेक्षित होते. लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह ग्रामीण महाराष्ट्राने भाजपला सपशेल हद्दपार केले. याचा सूड केंद्रातील मोदी-शहा जोडी नागरिकांवर उगवत आहे काय, असा संतप्त सवालसुद्धा या अर्थसंकल्पाच्या तरतुदींवरून डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुखcongressकाँग्रेसAmravatiअमरावतीBudgetअर्थसंकल्प 2024PuneपुणेnagpurनागपूरMumbaiमुंबई