शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बाधित सोयाबीनला शासन मदत, विमा भरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:01 AM

सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देनितीन धांडेची मागणी : आरडीसींना निवेदन, हजारो हेक्टरमध्ये नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततच्या पावसामुळे धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. फवारणीचा फारसा उपयोग झालेला नाही. सद्यस्थितीत सोयाबीनला चार-दोन शेंगा आहेत. याचा सरासरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव व विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोठोडा व आजूबाजूच्या परिसरातील सोयाबीन पिकाची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. सुरुवातीच्या काळात पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ झालेली नाही. आॅगस्ट अखेरपासून सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही. या प्रतिकूल वातावरणामुळे फवारणीपश्चातही सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.सद्यस्थितीत सोयाबीन पिकाला अत्यल्प शेंगा आहेत. सरासरी उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे या पिकांचे सर्वेक्षण करून शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी नितीन धांडे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रशांत वैद्य, अविनाश ब्राम्हणवाडे, मंगेश तुपट, अमोल सोनटक्के, सुरेश खटाळे, विठ्ठल सुरोशे, विठ्ठलराव पवार, पुंजाराम पाचमोहोर, प्रमोद सोनटक्के, तुकाराम सोनटक्के, भीमराव राऊत, संदीप सुरोशे, माणिकराव चोपडे, शालिग्राम तुपट, प्रकाश तुपट, सुभाष तुपट, सुभाष ठाकरे, बाबाराव सोनटक्के, दादाराव पवार, किशोर मोरे, रितेश कोल्हे यांच्यासह धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.वंचित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्याशासनाने शेतकºयांचे कर्जमाफ केले असले तरी महसूल विभाग व बँका यांच्यातील समन्वयाअभावी बहुतांश कर्जदार शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेतील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यांनाही तातडीने लाभ मिळावा. हरभºयाचे प्रलंबित अनुदान मिळावे आदी मागण्या नितीन धांडे यांनी निवेदनातून मांडल्या. निवासी उपजिल्हाधिकाºयांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व संबंधित विभागाला याविषयी तातडीने कळवून सर्वेक्षणाच्या सूचना दिल्यात.

टॅग्स :Socialसामाजिक