शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 11:41 IST

वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात उपाययोजनांना गती नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर लक्ष

अमरावती : उन्हाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात वनवणव्यांच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात उपाययोजनांना गती आली आहे. मात्र यंदा वनवणव्याने वन्यजीव होरपळून दगावले, अशा एकाही घटनेची नोंद नाही. तथापि, वनवणवा आणि तप्त उन्हाने वन्यजीवांना सैरभर व्हावे लागत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात वनवणव्यांच्या घटना घडत असतात. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच वनवणवा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने नियोजन कोलमडले आहे. विशेषतः विदर्भात वनक्षेत्राला आगी लागण्याच्या घटना दररोज निदर्शनास येत आहे. वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वणवा नियंत्रणासाठी २४ तास वनकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वनक्षेत्र अथवा व्याघ्र प्रकल्पातील आगीची माहिती मिळावी, यासाठी नासा सॅटेलाइटद्वारे वनविभागाला ‘फायर अलर्ट’ दिले जाते. वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर लक्ष आहे.

वनविभागासाठी दीड महिना धोक्याचा

नासाचे फायर अलर्ट हे वनविभागासाठी महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, पुढील दीड महिना जंगल क्षेत्रातील वणवा नियंत्रणात आणणे ही बाब वनविभागासाठी कसरत आहे. दऱ्या-खोऱ्यात आग लागल्यास तेथेपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरे साधनसामग्री हीदेखील मोठी समस्या आहे. एप्रिलअखेरचा आठवडा आणि मे महिन्यात वणवा लागण्याची दाट शक्यता आहे. तप्त उन्ह आणि वनवणवा या दोन्ही बाबी वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत.

यावर्षीच्या उन्हाळ्यात वनवणवा अथवा तप्त उन्हाने वन्यजीव होरपळून दगावले अशी घटना घडली नाही. खरे तर विदेशासारखे आपल्याकडील वनक्षेत्रांना चहुबाजूने आग लागत नाही. त्यामुळे कमीअधिक प्रमाणात आग आटोक्यात आणली जाते. वणव्यांवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव विभाग)

टॅग्स :forestजंगलfireआगweatherहवामानVidarbhaविदर्भ