शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 11:41 IST

वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात उपाययोजनांना गती नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर लक्ष

अमरावती : उन्हाचा पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात वनवणव्यांच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात उपाययोजनांना गती आली आहे. मात्र यंदा वनवणव्याने वन्यजीव होरपळून दगावले, अशा एकाही घटनेची नोंद नाही. तथापि, वनवणवा आणि तप्त उन्हाने वन्यजीवांना सैरभर व्हावे लागत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात वनवणव्यांच्या घटना घडत असतात. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच वनवणवा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने नियोजन कोलमडले आहे. विशेषतः विदर्भात वनक्षेत्राला आगी लागण्याच्या घटना दररोज निदर्शनास येत आहे. वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वणवा नियंत्रणासाठी २४ तास वनकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वनक्षेत्र अथवा व्याघ्र प्रकल्पातील आगीची माहिती मिळावी, यासाठी नासा सॅटेलाइटद्वारे वनविभागाला ‘फायर अलर्ट’ दिले जाते. वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये, यासाठी वनक्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर लक्ष आहे.

वनविभागासाठी दीड महिना धोक्याचा

नासाचे फायर अलर्ट हे वनविभागासाठी महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, पुढील दीड महिना जंगल क्षेत्रातील वणवा नियंत्रणात आणणे ही बाब वनविभागासाठी कसरत आहे. दऱ्या-खोऱ्यात आग लागल्यास तेथेपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरे साधनसामग्री हीदेखील मोठी समस्या आहे. एप्रिलअखेरचा आठवडा आणि मे महिन्यात वणवा लागण्याची दाट शक्यता आहे. तप्त उन्ह आणि वनवणवा या दोन्ही बाबी वन्यजीवांसाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत.

यावर्षीच्या उन्हाळ्यात वनवणवा अथवा तप्त उन्हाने वन्यजीव होरपळून दगावले अशी घटना घडली नाही. खरे तर विदेशासारखे आपल्याकडील वनक्षेत्रांना चहुबाजूने आग लागत नाही. त्यामुळे कमीअधिक प्रमाणात आग आटोक्यात आणली जाते. वणव्यांवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव विभाग)

टॅग्स :forestजंगलfireआगweatherहवामानVidarbhaविदर्भ