शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेत वाढ, आरटीई प्रवेशासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:39 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देशित केले आहे.

जितेंद्र दखनेअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देशित केले आहे. या जागांवर प्रवेश मिळविणा-या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते.त्यानुसार शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये होणा-या २५ टक्के प्रवेशाकरिता प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये कमाल अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर अनुदान शैक्षणिक सत्र २०१६-२०१७ साठी निर्धारित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक खासगी विनाअनुदानित शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित कुटुंबातील बालकांकरिता २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्या जागांवर प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे, अशा बालकांच्या पालकांकडून शिक्षण शुल्क आकारण्यात येत नाही. परंतु शाळांना येणा-या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे प्रति विद्यार्थी शाळांना येणारा खर्च राज्य शासनाकडून देण्यात येतो. शिक्षण हक्क कायदा लागू झाला तेव्हा शाळांना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते.परंतु अनेक शाळांनी सदर अनुदानात वाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. खासगी शाळांमधील शिक्षकांचे वेतन आणि तेथील शैक्षणिक सुविधा लक्षात घेता शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के प्रवेशांच्या अनुदानात प्रतिपूर्ती वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक सत्र २०१६ आणि २०१७ करिता प्रति विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत, त्या शाळेने विद्यार्थ्यांना आकारलेल्या निव्वळ शैक्षणिक शुल्क अथवा शासनाने निर्धारित केलेल्या रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम प्रतिपूर्तीसाठी सादर करावी, असेही शासन आदेशात नमूद आहे.शासनाने प्रतिपूर्ती शुल्कात नुकतीच वाढ केली आहे. त्यानुसार प्राप्त सूचनेप्रमाणे याचा लाभ संबंधित शाळांना दिला जाईल.- आर. डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती