शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेत वाढ, आरटीई प्रवेशासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 16:39 IST

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देशित केले आहे.

जितेंद्र दखनेअमरावती : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देशित केले आहे. या जागांवर प्रवेश मिळविणा-या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून केली जाते.त्यानुसार शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये होणा-या २५ टक्के प्रवेशाकरिता प्रतिविद्यार्थी १७ हजार ६७० रुपये कमाल अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर अनुदान शैक्षणिक सत्र २०१६-२०१७ साठी निर्धारित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक खासगी विनाअनुदानित शाळांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित कुटुंबातील बालकांकरिता २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. त्या जागांवर प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे, अशा बालकांच्या पालकांकडून शिक्षण शुल्क आकारण्यात येत नाही. परंतु शाळांना येणा-या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासनाकडून करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे प्रति विद्यार्थी शाळांना येणारा खर्च राज्य शासनाकडून देण्यात येतो. शिक्षण हक्क कायदा लागू झाला तेव्हा शाळांना प्रतिविद्यार्थी १० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते.परंतु अनेक शाळांनी सदर अनुदानात वाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. खासगी शाळांमधील शिक्षकांचे वेतन आणि तेथील शैक्षणिक सुविधा लक्षात घेता शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के प्रवेशांच्या अनुदानात प्रतिपूर्ती वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक सत्र २०१६ आणि २०१७ करिता प्रति विद्यार्थी १७ हजार ६७० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत, त्या शाळेने विद्यार्थ्यांना आकारलेल्या निव्वळ शैक्षणिक शुल्क अथवा शासनाने निर्धारित केलेल्या रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम प्रतिपूर्तीसाठी सादर करावी, असेही शासन आदेशात नमूद आहे.शासनाने प्रतिपूर्ती शुल्कात नुकतीच वाढ केली आहे. त्यानुसार प्राप्त सूचनेप्रमाणे याचा लाभ संबंधित शाळांना दिला जाईल.- आर. डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती