शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

शहरात धूलीकणांच्या प्रदूषणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:47 IST

शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.

ठळक मुद्देअनुज्ञेय पातळीवर प्रमाण : वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.मागील दोन वर्षांच्या तुलनेत अमरावती शहराच्या वाणिज्य भागातील प्रदूषण काहीअंशी कमी असले तरी सरासरी अनुज्ञेय पातळीच्या अधिकच आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात रस्ते, नाल्या, उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत. त्यामुळेदेखील धूलिकनांचे प्रदूषण वाढल्याची शक्यता आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्या वाढल्यानेही प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव आहे. अमरावती शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अ‍ॅबीयंट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग (अअदट) नुसार रहिवासी क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १७.९९ व १४.१८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट (सूक्ष्म धूलिकण) सरासरी प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 आढळून आले. औद्योगिक क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 आढळून आले आहे. हे प्रमाण प्रदूषण पातळीच्या कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण १०८.९१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीच्या पेक्षा (१०० ४ॅ/े3) आढळले. व्यापारी क्षेत्रात ठड रड2 चे सरासरी प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा अहवाल आहे.वाढते नागरीकरण, डीजे संस्कृतीचे वाढते फॅड यामुळे शहराच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिकदृट्या मोठा परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालया सभोवती १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात ५८१ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केल्याचे महापालिका उपायुक्त महेश देशमुख म्हणाले.मानवी शरीरास घातकहवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेचे रोग जडतात. फुफ्फुसाचा कर्करोग,हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात जाणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. प्रदूषित वातावरणात राहणाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या हृदयविकाराचे झटके येतात. या अशुद्ध हवेने तसेच धूम्रपानातील धुराने रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते व त्या सुजतात. प्रदूषणाचे संकट हे अदृश्य असल्याने, सर्वसामान्यांना त्याचा नकळत परिणाम झाला तरी बरेचदा प्रत्यक्षात जाणवत नाही.उच्च रक्तदाबाच्या आजारात वाढ -तज्ज्ञशहरात हवेचे प्रदूषण वाढल्याने नागरिकांना उच्च रक्तदाबाचे विकार जडतात. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबवाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा रक्तदाब पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. रक्ताचा वाढणारा दाब अ‍ॅथरोस्लेरोसिस या व्याधीचा प्रारंभ करतो व त्यातून रक्तवाहिन्या कठीण होत जातात. पुढे, त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो. म्हणून हृदयरुग्णांनी प्रदूषित हवेपासून दूर राहणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.शहरात वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती आदींमुळे धूलिकणांचे प्रदूषण वाढत आहे. हे नियंत्रित करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.- संजय पाटील,विभागीय व्यवस्थापक,प्रदूषण नियंत्रण मंडळ