शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

शहरात धूलीकणांच्या प्रदूषणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:47 IST

शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.

ठळक मुद्देअनुज्ञेय पातळीवर प्रमाण : वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.मागील दोन वर्षांच्या तुलनेत अमरावती शहराच्या वाणिज्य भागातील प्रदूषण काहीअंशी कमी असले तरी सरासरी अनुज्ञेय पातळीच्या अधिकच आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात रस्ते, नाल्या, उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत. त्यामुळेदेखील धूलिकनांचे प्रदूषण वाढल्याची शक्यता आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्या वाढल्यानेही प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव आहे. अमरावती शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अ‍ॅबीयंट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग (अअदट) नुसार रहिवासी क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १७.९९ व १४.१८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट (सूक्ष्म धूलिकण) सरासरी प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 आढळून आले. औद्योगिक क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 आढळून आले आहे. हे प्रमाण प्रदूषण पातळीच्या कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण १०८.९१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीच्या पेक्षा (१०० ४ॅ/े3) आढळले. व्यापारी क्षेत्रात ठड रड2 चे सरासरी प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा अहवाल आहे.वाढते नागरीकरण, डीजे संस्कृतीचे वाढते फॅड यामुळे शहराच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिकदृट्या मोठा परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालया सभोवती १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात ५८१ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केल्याचे महापालिका उपायुक्त महेश देशमुख म्हणाले.मानवी शरीरास घातकहवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेचे रोग जडतात. फुफ्फुसाचा कर्करोग,हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात जाणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. प्रदूषित वातावरणात राहणाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या हृदयविकाराचे झटके येतात. या अशुद्ध हवेने तसेच धूम्रपानातील धुराने रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते व त्या सुजतात. प्रदूषणाचे संकट हे अदृश्य असल्याने, सर्वसामान्यांना त्याचा नकळत परिणाम झाला तरी बरेचदा प्रत्यक्षात जाणवत नाही.उच्च रक्तदाबाच्या आजारात वाढ -तज्ज्ञशहरात हवेचे प्रदूषण वाढल्याने नागरिकांना उच्च रक्तदाबाचे विकार जडतात. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबवाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा रक्तदाब पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. रक्ताचा वाढणारा दाब अ‍ॅथरोस्लेरोसिस या व्याधीचा प्रारंभ करतो व त्यातून रक्तवाहिन्या कठीण होत जातात. पुढे, त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो. म्हणून हृदयरुग्णांनी प्रदूषित हवेपासून दूर राहणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.शहरात वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती आदींमुळे धूलिकणांचे प्रदूषण वाढत आहे. हे नियंत्रित करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.- संजय पाटील,विभागीय व्यवस्थापक,प्रदूषण नियंत्रण मंडळ