शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

शहरात धूलीकणांच्या प्रदूषणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:47 IST

शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.

ठळक मुद्देअनुज्ञेय पातळीवर प्रमाण : वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात विकासकामांतून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश भागात हवेचे प्रदूषण वाढले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक परिसरात याचे प्रमाण अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा प्रदूषण नियामक मंडळाचा अहवाल आहे. हे प्रदूषण मानवी आरोग्यासाठी घातक आहे.मागील दोन वर्षांच्या तुलनेत अमरावती शहराच्या वाणिज्य भागातील प्रदूषण काहीअंशी कमी असले तरी सरासरी अनुज्ञेय पातळीच्या अधिकच आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात रस्ते, नाल्या, उड्डाणपुलाचे काम सुरू आहेत. त्यामुळेदेखील धूलिकनांचे प्रदूषण वाढल्याची शक्यता आहे. त्याचसोबत शहरात वाहनांची संख्या वाढल्यानेही प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव आहे. अमरावती शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अ‍ॅबीयंट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग (अअदट) नुसार रहिवासी क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १७.९९ व १४.१८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट (सूक्ष्म धूलिकण) सरासरी प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 आढळून आले. औद्योगिक क्षेत्रात ठड रड2 चे प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 आढळून आले आहे. हे प्रमाण प्रदूषण पातळीच्या कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण १०८.९१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीच्या पेक्षा (१०० ४ॅ/े3) आढळले. व्यापारी क्षेत्रात ठड रड2 चे सरासरी प्रमाण १८.९६ व १७.७८ ४ॅ/े3 हे प्रमाण प्रदूषण पातळीपेक्षा कमी आहे. मात्र, फरढट चे प्रमाण ११८.७६ ४ॅ/े3 म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा अधिक असल्याचा अहवाल आहे.वाढते नागरीकरण, डीजे संस्कृतीचे वाढते फॅड यामुळे शहराच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिकदृट्या मोठा परिणाम होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालया सभोवती १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात ५८१ ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केल्याचे महापालिका उपायुक्त महेश देशमुख म्हणाले.मानवी शरीरास घातकहवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेचे रोग जडतात. फुफ्फुसाचा कर्करोग,हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात जाणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. प्रदूषित वातावरणात राहणाऱ्यांना तुलनात्मकदृष्ट्या हृदयविकाराचे झटके येतात. या अशुद्ध हवेने तसेच धूम्रपानातील धुराने रोहिणी या शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना स्लेरोसिसची व्याधी जडते व त्या सुजतात. प्रदूषणाचे संकट हे अदृश्य असल्याने, सर्वसामान्यांना त्याचा नकळत परिणाम झाला तरी बरेचदा प्रत्यक्षात जाणवत नाही.उच्च रक्तदाबाच्या आजारात वाढ -तज्ज्ञशहरात हवेचे प्रदूषण वाढल्याने नागरिकांना उच्च रक्तदाबाचे विकार जडतात. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्पातून उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबवाढीस कारणीभूत ठरतात. अशा प्रकारचा रक्तदाब पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. रक्ताचा वाढणारा दाब अ‍ॅथरोस्लेरोसिस या व्याधीचा प्रारंभ करतो व त्यातून रक्तवाहिन्या कठीण होत जातात. पुढे, त्याचा हृदयावर विपरीत परिणाम होतो. म्हणून हृदयरुग्णांनी प्रदूषित हवेपासून दूर राहणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.शहरात वाहनांची वाढती संख्या, पायाभूत सुविधांची निर्मिती आदींमुळे धूलिकणांचे प्रदूषण वाढत आहे. हे नियंत्रित करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.- संजय पाटील,विभागीय व्यवस्थापक,प्रदूषण नियंत्रण मंडळ