शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

‘उपाशीपोटी गेलं वं मायं लेकरू!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:37 PM

शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.आर्थिक स्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबातील वैभव गावंडे याचे वडील हरिदास हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आजी, आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी असे त्याचे कुटुंबीय. लहानपणापासून लाडत वाढलेल्या वैभव हा शांत व सोज्वळ स्वभावाचा होता. कुटुंबीयांच्या प्रत्येक कामात तोच पुढाकार घेऊन हातभार लावायचा. त्यामुळे कुटुंबीयांचा तो लाडका होता. दररोज घरून जेवण करूनच वैभव शाळेत निघायचा. शुक्रवारी तयारी करीत असताना थोडा उशिरा झाला. स्कूल बस घ्यायला येईल, हॉर्न वाजवेल, या दडपणातून वैभव घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवूनच होता. दहाचा ठोका झाला आणि जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आईने दाराजवळ आली. जेवण करून जा म्हणून सांगितले. मात्र, उशीर होत असल्याने वैभवने तिचे काही एक ऐकले नाही. स्कूल व्हॅनचा हॉर्न वाजला आणि तो धावत जाऊन वाहनात बसला. हीच माय-लेकराची शेवटची भेट ठरली. वर्गमित्रांसोबत गप्पा करीत तो शाळेत पोहोचला. शाळेतील वर्ग सुरू झाले आणि त्यानंतर मित्रांसह तो पडक्या खोलीत गेला. तेथे भिंत अंगावर कोसळल्याने वैभवाचा मृत्यू झाला.वैभवच्या कुटुंबातील सदस्याला शाळेत नोकरीमृत्युमुखी पडलेला वैभवच्या मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला शाळेत नोकरी देण्याचे आश्वासन याप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी दिले. मृत वैभव तसेच जखमी मुलांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत तसेच शाळा व्यवस्थापनातील दोषींनाही निलंबित करण्याचे आश्वासनदेखील आ. कडू यांनी दिले. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे आ. कडू यांनी सांगितले.काळजाचा तुकडा हिरावल्याने आक्रोशवैभवच्या मृत्यूची वार्ता ऐकताच हरिदास गावंडे हे शेतातील काम सोडून शाळेकडे बेफाम धावत सुटले. घरी असलेली आई, भाऊ व बहिणीदेखील हातातील कामे सोडून शाळेत पोहोचले. वैभवचा मृतदेह पाहून एकच आक्रोश सुरू झाला. हातपाय आपटत हंबरडा फोडणाऱ्या वैभवच्या आईचा आक्रोश पाहून समाजमन हेलावून गेले होते. पत्नी, मुलांचा आक्रोश व रडणे पाहून वडिलांनाही अश्रू अनावर झाले. गावकरी व मित्रमंडळी गावंडे कुटुंबाला धीर देत होते. मात्र, त्यांना आवरणे कठीण होते.