शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राष्ट्रीय महामार्गावर ठिगळांचाही होणार का 'विश्वविक्रम'? सहा महिन्यांतच पडले खड्डे

By गणेश वासनिक | Updated: December 9, 2022 10:48 IST

Amravati-Akola highway : रस्ता दुभाजकाकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष, ब्रिज निर्मिती संथगतीने, अपघाताची शक्यता

अमरावती : अमरावती ते मलकापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या वाटा गत १२ वर्षांपासून बिकटच आहेत. लोणी ते मूर्तिजापूरदरम्यान रस्ता डांबरीकरणाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद झालेल्या या राष्ट्रीय महामार्गावर सहा महिन्यांत जागोजागी ठिगळे लागली आहेत. तीन मोठे ब्रिज आणि ५१ पुलांची निर्मिती संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी अपघातप्रवण स्थळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आता काय खड्ड्यांचा विश्वविक्रम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमरावती ते मलकापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ विदर्भातील जनतेच्या विकासाचा साथीदार ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरत आहे. ७ जून २०२२ रोजी अमरावती ते मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी ते नवसाळपर्यंत विश्वविक्रमी रस्ता डांबरीकरणाची नाेंद करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांतच या महामार्गावर अनेक ठिकाणी ठिगळे लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पुणे येथील राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या महामार्गाचे डांबरीकरण करताना वापरलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे स्पष्ट होते.

लोणी, नागझिरी येथे ब्रिज निर्मितीस्थळी भूलभुलैय्या

या महामार्गावर लोणी आणि नागझिरी फाटा येथे दोन मोठ्या ब्रिज निर्मितीचे कार्य सुरू आहे. मात्र, वाहनचालकांना कोणत्या दिशेने वाहनांची ने-आण करावी, यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे लोणी, नागझिरी हे दोन्ही पॉइंट अपघातप्रवणस्थळ झाले आहेत. कंत्राटदाराने येथे दिशादर्शक फलक लावावेत, अशी वाहनचालकांची मागणी आहे. गत तीन वर्षांपासून ब्रिज निर्मितीचे काम सुरू असताना ते अद्यापही पूर्ण झाले नाही, हे काम युद्धस्तरावर व्हावे, अशी महामार्गालगतच्या गावकऱ्यांची मागणी आहे.

दुभाजकाची स्थिती धोकादायक

मोठा गाजावाजा करून रस्ते डांबरीकरणाच्या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली; मात्र गत सहा महिन्यांपासून दुभाजकाची स्थिती धोकादायक आहे. दुभाजकात केवळ माती टाकण्यात आली असून, त्यात गवत, तण वाढले आहे. दुभाजकाला रंगरंगोटी नसल्याने रात्री ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. या महामार्गावर समांतर रस्ता ही मोठी समस्या असताना त्याकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष आहे.

मूर्तिजापूर येथील नागरिक त्रस्त

मूर्तिजापूर येथे ब्रिज निर्मितीचे कार्य संथगतीने होत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यापेक्षा ब्रिज नको, असे म्हणण्याची वेळ मूर्तिजापूरवासीयांवर आली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकPotholeखड्डे