शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

२१ दिवसांत १६९ कोटी कसे खर्च करणार? मार्चअखेर निधी पूर्णपणे खर्च करण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:46 IST

डीपीसीचा ४७५ कोटींचा आराखडा : विविध यंत्रणेकडे वितरित झाले ३०५ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन स्तरावरून येणाऱ्या विकासनिधीचे नियोजन जिल्हा स्तरावर केले जाते. वार्षिक आराखडा तयार करून योजनानिहाय हा निधी वितरित केला जातो. यासाठी ग्रामीण, शहरी आणि दुर्गम भाग यातील कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जातो. त्यानंतरच विकासाला गती मिळते. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा जिल्हा नियोजन विभागाचा सुमारे ४७४ कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत ३०५ कोटी रुपयांचा निधी विविध विभागांना योजनानिहाय निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी मंजूर कामानुसार संबंधित यंत्रणांना वितरित केला जाईल. मंजूर कामे संबंधित यंत्रणाकडून केली जाणार आहेत. मार्च एडींगसाठी २१ दिवसांचा अवधी असल्याने उर्वरित निधी हा शंभर टक्के खर्च करण्याचे आवाहन आहे.

निधीचा उपयोग कशासाठी करणारडीपीसीमार्फत विविध यंत्रणाच्या मागणी प्रस्तावानुसार तरतूद केली जाते. यात सुचविलेल्या कामानुसार हा निधी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, ऊर्जा आदी कामांवर प्राधान्याने खर्च केला जाणार आहे.

मार्चअखेर निधी पूर्णपणे खर्च करण्याचे उद्दिष्टजिल्ह्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा डीपीसीचा आराखडा ४७४ कोटींचा होता. यापैकी आतापर्यंत ३०५ कोटी रुपयांचा निधी विविध यंत्रणाकडे वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी खर्चाच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजनानुसार प्रक्रिया सुरू आहे. ३१ मार्चपर्यंत शंभर टक्के निधी खर्च करण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून संबंधित यंत्रणाकडून प्रक्रिया राबविली जात आहे.

आदिवासी उपाययोजनाआदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटात आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. यासाठी मंजूर असलेला निधी मुदतीत खर्च करण्यासाठी नियोजन केले जाते. त्यानुसार निधीमुदतीत खर्च करण्याचे नियोजन आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती