शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

मेळघाटातील पाड्यांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 5:00 AM

गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन  नुकसान झाले.

ठळक मुद्देसुसर्दाजवळ दरड कोसळली, घरे कोसळले, आरोग्य यंत्रणेची कसरत, गढूळ पाण्याने जलजन्य रोगाच्या साथीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा :  मेळघाटात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा तालुक्यातील अनेक मार्ग बंद होते प्रशासनाच्या वतीने कार्य सुरू असले तरी कोसळलेल्या पावसामुळे जलजन्य रोगाची साथ पसरण्याची भीती वाढविल्या जात असून यातून आरोग्य यंत्रणेची कसरत होणार आहे त्याचा फटका सर्वाधिक गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार आहे.गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन  नुकसान झाले. जामली आर. येथील सोना साकू कासदेकर यांचे घर कोसळले मनभंग, भिलखेडा, भांद्री, आडनदी, खीरपाणी, सावरपाणी, गरजदरी येथील शेतीचे नुकसान झाले.

काटकुंभ येथे दूषित पाण्याचा पुरवठातालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी ग्रामपंचायतीच्या नाळ योजनेतून झाल्यामुळे तीन किलोमीटर अंतरावरून डोमा येथील हातपंपाचे पाणी नागरिकांना आणावे लागत आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावातील असल्याचे वास्तव आहे.

जलजन्य आजाराची भीती काय?मागील दोन दिवसापासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आदिवासी पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, अनेक गावांमध्ये दूषित पाणी मिळत असल्याने जलजन्य आजाराची भीती वर्तविली जात आहे. याचा सर्वाधिक फटका गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार असल्याची भीती आरोग्य यंत्रणेने वर्तविली आहे. दुसरीकडे मार्ग बंद झाल्यास आजारी रुग्ण, गर्भवती मातांना उपचारार्थ दाखल करणे कसरतीचे असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी 'लोकमतशी बोलताना सांगितले.

बंद रस्ते व दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराची भीती आहे. सर्वाधिक आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे नागरिकांनी पाणी गाळून उकळून प्यावे असे आव्हान करण्यात आले आहे  थांबून थांबून पाऊस होत असल्याने डबक्यातील साचलेल्या पाण्यामुळे डासांची भीती आहे. कुपोषित बालक, गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे.सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

 

टॅग्स :Rainपाऊस