शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 10:53 IST

सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अमरावती/वर्धा : सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले आहे. शेतात पाणी साचले असून, पेरण्या दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले.

अमरावती, तिवसा, मोर्शी व धामणगाव तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पाऊस झाल्याने खरिपाला दिलासा मिळाला. आता थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्या गतिमान होणार आहेत. २३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला व काही गावात पावसाचे पाणी शिरले. तिवसा आठवडी बाजारात हर्रासाकरिता आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकल्याने जिल्हा शोध व बचावकार्य करीत सुखरूप बाहेर काढले. जोरदार पावसात ५० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली असून, तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

देवळी-नांदुरा मार्गावरील पूल खचला....

वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी व आर्वी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर देवळी-नांदुरा मार्गावरील पूल क्षतीग्रस्त झाला आहे. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा या गावातील सखल भागातील ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ५४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, ९९६ हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरweatherहवामानAmravatiअमरावतीwardha-acवर्धाVidarbhaविदर्भ