शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

अमरावती, वर्धा जिल्ह्यांतील आठ तालुक्यांत अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तिवशात ४० जणांचे ‘रेस्क्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 10:53 IST

सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अमरावती/वर्धा : सोमवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले आहे. शेतात पाणी साचले असून, पेरण्या दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले.

अमरावती, तिवसा, मोर्शी व धामणगाव तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २५.७ मिमी पाऊस झाल्याने खरिपाला दिलासा मिळाला. आता थबकलेल्या तीन लाख हेक्टरमधील पेरण्या गतिमान होणार आहेत. २३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला व काही गावात पावसाचे पाणी शिरले. तिवसा आठवडी बाजारात हर्रासाकरिता आलेले ४२ व्यापारी व विक्रेते पुराच्या पाण्यात अडकल्याने जिल्हा शोध व बचावकार्य करीत सुखरूप बाहेर काढले. जोरदार पावसात ५० पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली असून, तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

देवळी-नांदुरा मार्गावरील पूल खचला....

वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, देवळी व आर्वी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याने उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर देवळी-नांदुरा मार्गावरील पूल क्षतीग्रस्त झाला आहे. आर्वी तालुक्यातील देऊरवाडा या गावातील सखल भागातील ११० घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ५४ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, ९९६ हेक्टरवरील शेतपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरweatherहवामानAmravatiअमरावतीwardha-acवर्धाVidarbhaविदर्भ