शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, हजारो एकर शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2022 13:00 IST

चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अमरावती : जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला असून नागरिकांची अक्षरश: ताराबंळ उडाल्याचे चित्र आहे. चांदूर बाजार शहरासह तालुक्यात जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले, अनेक घरात पावसाचे पाणी घुसले असून साहित्याची नासाडी झाली आहे. 

चांदूर बाजार शहरातील रामभट प्लॉट, मैनाबाई शाळा परिसर या भागातील जवळजवळ ३०० ते ४००  नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यासोबतच तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील बांध फुटून हजारो एकर शेती पावसाच्या पाण्यामुळे जलमग्न झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असतानाही ग्राम पंचायतीकडून तुंबलेल्या नाल्यांची वेळेवर साफसफाई न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

दरम्यान, वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नागपूरसह लगतच्या जिल्ह्याच्या आसमंतात ढग दाटले आहेत. नागपूरसह  विदर्भातील सर्वच जिल्ह्यात रविवारच्या रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. तर, येत्या ८ जुलैपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने पुढील ३-४ दिवस पावसाचे राहणार आहेत.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामानamravati-acअमरावतीVidarbhaविदर्भ