शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Amravati: हाफ मॅरेथॉन: धावले अंबानगरीकर..., वेळेच्या अचुक नोंदीसाठी चिपचा वापर

By गणेश वासनिक | Updated: October 8, 2023 15:50 IST

Amravati: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा सक्षम व्हावे व प्रत्येक व्यक्तीला निरामय आरोग्य जगता यावे, याकरिता अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २३०० पेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता.

- गणेश वासनिक अमरावती -  आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा सक्षम व्हावे व प्रत्येक व्यक्तीला निरामय आरोग्य जगता यावे, याकरिता अमरावतीमॅरेथॉन असोसिएशनच्यावतीने रविवारी आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत २३०० पेक्षा अधिक धावकांनी सहभाग घेतला होता. धावकांच्या उत्स्फूर्त सहभागाने या स्पर्धेला आणखीच रंगत आली.

लहान चिमुकल्यांचा किलबिल, तरुणांचा उत्साहपूर्ण जोश आणि वरिष्ठांच्या सहभागामुळे अतिशय उत्कंठापूर्वक वातावरणात ही हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ६.०० वाजताच सुरु झाली. आमदार सुलभा खोडके, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, महापालिका आयुक्त देविदास पवार, क्रीडा उपसंचालक विजय संतान आदींनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. २१ कि.मी. ही हाफ मॅरेथॉन जवाहरलाल नेहरु स्टेडीयम येथून सुरु झाली. या स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम, पंचवटी चौक, वेलकम पाईंट, बियाणी चौक, नेताजी कॉलनी-मार्डी रोड परत विद्यापीठ परिसर, बियाणी चौक, वेलकम पॉईंट, बियाणी चौक, इर्वीन चौक, राजकमल उडाणपूल, राजापेठ पोलिस स्टेशन पासून परत राजकमल उड्डाण पुल, इर्वीन चौक ते जिल्हा स्टेडीयम असा होता.

१० कि.मी. पावर रन सकाळी ६.१५ वाजता लहान मुलांचा ५ कि.मी. व ५ किमी फीटनेस चॅलेंज ही स्पर्धा ६.३० वाजता सुरु झाली. स्पर्धेअंती सर्व गटातील विजेतांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज व रोख बक्षीस देण्याकरीता बक्षीस वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता आयोजीत करण्यात आला होता. एकूण ३.२५ लक्ष रुपयाचे रोख बक्षीस सर्व विजेत्यांना देण्यात आले.

कार्यक्रमच संचालन व आभार ममेश माथनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दिलीप पाटील, डॉ अतुल पाटील, डॉ सुभाष गावंडे, किशोर वाठ, मुकुंद वानख, सतीश दवंडे गजानन धर्माळे, नरेंद्र पंचारिया, राहुल पाटील, संध्या पाटील, अपूर्वा गोळे आदींनी सहकार्य केले.

वेळेच्या अचुक नोंदीसाठी चिपचा वापर२१ कि.मी. व १० किमी मधील स्पर्धकांची अचुक वेळ नोंदविण्याकरीता व इलेक्ट्रॉनीक टायमींग चिपचा वापर करण्यात आला. याकरिता स्पर्धेच्या सुरवातीला मार्डी रोडवर नेताजी कॉलनी जवळ व राजापेठ पोलिस स्टेशन जवळ इलेक्ट्रॉनीक सेन्सर स्थानक उभारण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धक या चारही ठिकाणावरुन गेला किंवा नाही याची खातरजमा याव्दारे करण्यात आली.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनAmravatiअमरावती