शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अर्ध्या शतकापासून ‘ते’ रेडिओला म्हणतात, ‘तू माझा सांगाती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:30 IST

येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.

ठळक मुद्देतंदुरूस्त अण्णा : वयाच्या ९३ व्या वर्षीही रोज वाचतात चष्म्याविना 'लोकमत'

देवेंद्र धोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा(शहीद) : येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.वर्तमानपत्रानंतर भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले. बी.बी.सी.च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कापोर्रेशनच्यावतीने पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीची सुरुवात केली. मात्र, १९२४ साली मद्रास येथून एका खासगी संस्थेने प्रसारणास सुरुवात केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली. कामगार व उद्योग या विभागांतर्गत 'भारतीय राज्य प्रसारण मंडळ' नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे 'आॅल इंडिया रेडिओ' असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा 'आॅल इंडिया रेडिओ' नावाचा स्वतंत्र विभाग माहिती, प्रसारण मंत्रालयांतर्गत स्थापन केला. त्याचे अधिकृतरीत्या 'आकाशवाणी' हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. वर्तमानपत्रानंतर आलेला रेडिओ प्रसार माध्यमाचा जगातील क्रांतिकारी आविष्कार होता.अण्णा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या गोपाळरावांनी ४७ वर्षांआधी जेव्हा रेडिओ खरेदी केला, तेव्हा लोकांत कुतूहल होती. नुसता हा बोलता पोपट पाहण्यासाठी अनेक लोकं त्यांच्याकडे यायचे. बातम्या व मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकण्यासाठी रोजच्या गर्दीचे अनेक किस्से अण्णा सांगतात. राष्ट्रीय घडामोडी, देशाच्या निवडणुकांचे निकाल, पाकिस्तानशी युद्वाविषयीच्या बातम्या जेव्हा प्रसारित व्हायच्या, तेव्हा तर ऐकणाºयांची संख्या शेकडोच्या घरात असायची, असे अण्णा सांगतात. इंदिरा गांधींच्या हत्तेची बातमी ऐकायला सतत आठ-दहा दिवस लोकं जमायची, इतकेच नाही तर वार्तांकन सुरू असताना अनेक जणांना अश्रू अनावर व्हायचे, असे कित्येक किस्से अण्णांकडे आहेत.रेडिओशी नाळ कायमटेलीव्हिजनच्या शोधाने रेडिओ मागे पडला. आज इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया सर्वाधिक लोकांची पसंती असल्याने रेडिओ कालबाह्य झाले असताना वयाच्या ९३ व्या वर्षीही त्यांना वाचन करण्यासाठी चष्म्याची गरज भासत नाही, हे विशेष. घरी सर्वच साधने असली तरीही गोपाळरावांनी मात्र रेडिओशी आपली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे अण्णा आपल्या जुन्या मित्राला बेइमान झालेले नाहीत.