शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या शतकापासून ‘ते’ रेडिओला म्हणतात, ‘तू माझा सांगाती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:30 IST

येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.

ठळक मुद्देतंदुरूस्त अण्णा : वयाच्या ९३ व्या वर्षीही रोज वाचतात चष्म्याविना 'लोकमत'

देवेंद्र धोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कबेनोडा(शहीद) : येथील ९३ वर्षीय गोपाळराव यावले यांची ४७ वर्षांपासून रेडिओशी जुळलेली सलगी आजतागायत कायम आहे. त्यामुळे ते आजही रेडिओला तू माझा सांगाती, असे संबोधतात.वर्तमानपत्रानंतर भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले. बी.बी.सी.च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्रॉडकास्टिंग कापोर्रेशनच्यावतीने पहिल्यांदा मुंबई आकाशवाणीची सुरुवात केली. मात्र, १९२४ साली मद्रास येथून एका खासगी संस्थेने प्रसारणास सुरुवात केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली. कामगार व उद्योग या विभागांतर्गत 'भारतीय राज्य प्रसारण मंडळ' नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे 'आॅल इंडिया रेडिओ' असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा 'आॅल इंडिया रेडिओ' नावाचा स्वतंत्र विभाग माहिती, प्रसारण मंत्रालयांतर्गत स्थापन केला. त्याचे अधिकृतरीत्या 'आकाशवाणी' हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. वर्तमानपत्रानंतर आलेला रेडिओ प्रसार माध्यमाचा जगातील क्रांतिकारी आविष्कार होता.अण्णा म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या गोपाळरावांनी ४७ वर्षांआधी जेव्हा रेडिओ खरेदी केला, तेव्हा लोकांत कुतूहल होती. नुसता हा बोलता पोपट पाहण्यासाठी अनेक लोकं त्यांच्याकडे यायचे. बातम्या व मनोरंजनाचे कार्यक्रम ऐकण्यासाठी रोजच्या गर्दीचे अनेक किस्से अण्णा सांगतात. राष्ट्रीय घडामोडी, देशाच्या निवडणुकांचे निकाल, पाकिस्तानशी युद्वाविषयीच्या बातम्या जेव्हा प्रसारित व्हायच्या, तेव्हा तर ऐकणाºयांची संख्या शेकडोच्या घरात असायची, असे अण्णा सांगतात. इंदिरा गांधींच्या हत्तेची बातमी ऐकायला सतत आठ-दहा दिवस लोकं जमायची, इतकेच नाही तर वार्तांकन सुरू असताना अनेक जणांना अश्रू अनावर व्हायचे, असे कित्येक किस्से अण्णांकडे आहेत.रेडिओशी नाळ कायमटेलीव्हिजनच्या शोधाने रेडिओ मागे पडला. आज इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया सर्वाधिक लोकांची पसंती असल्याने रेडिओ कालबाह्य झाले असताना वयाच्या ९३ व्या वर्षीही त्यांना वाचन करण्यासाठी चष्म्याची गरज भासत नाही, हे विशेष. घरी सर्वच साधने असली तरीही गोपाळरावांनी मात्र रेडिओशी आपली नाळ कायम ठेवली आहे. त्यामुळे अण्णा आपल्या जुन्या मित्राला बेइमान झालेले नाहीत.