शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली: नागनाथ कोतापल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 17:37 IST

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले.

अमरावती : संविधानाला न बदलविता संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली केली जात असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या अमरावती येथील चौथ्या अधिवेशनाच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून कोतापल्ले रविवारी बोलत होते. त्यांच्या मते, पुरातन काळापासून या देशात ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती, असा संघर्ष सुरू आहे. 

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले. १९२५ मध्येच ब्राह्मणेतर काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. देशामध्ये महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ अशा परिवर्तनाच्या चळवळींनी देशात वाटचाल केली. त्याचवेळी देशातील सनातन, कर्मठ रुढी परंपरावादी व वर्चस्ववादी विचारांनी संघटित होण्याचे व पुरोगामी चळवळीला प्रतिकार करण्याचे काम केल्याचे कोतापल्ले म्हणाले. 

स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीत व सर्वसामान्य शोषित पीडित समाजाच्या कल्याणाचा घटनेत अंर्तभाव करून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संविधानात भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब नाही व ती काहीच कामाची नाही, असे सांगून घटनेला गोधडी संबोधले होते. त्यानंतर ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, अशा लोकांच्या हातात देशाची सत्तासूत्रे असल्यामुळे ते गोळवलकरांचा 'दी बंच ऑफ थॉट' यातील विचारावर आधारित भारत घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच देशात सध्या विभाजनाची, असंतोषाची व अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा भारतीय फॅसिझम नव्या स्वरुपाचा असून मानव जातीला कल्याणकारी ठरणारा नाही, असे कोतापल्ले म्हणाले.   सिने अभिनेते तथा लेखक वीरा साथीदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रलेसंचे राष्ट्रीय सचिव तथा हिंदी साहित्यिक विनीत तिवारी यांनी बीजभाषण केले. यावेळी हिंदी साहित्यिक उषा आठल्ये(छत्तीसगढ) जी. के. एनापुरे, शाहीर शीतल साठे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे व्यासपीठावर उपस्थित होते. या अधिवेशनास कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे कार्यक्रमाचे समन्वयक प्रसेनजित तेलंग होते. यावेळी श्रीराम पवार (मुंबई), प्रवीण बनसोड (विदर्भ), समाधान वानखडे (मराठवाडा), दत्ता घोलप (पश्र्चिम महाराष्ट्र), संदीप पवार (कोकण) व उत्तर महाराष्ट्रातील अहवाल वाचन प्रमोद अहिरे यांनी केले. प्रास्ताविक राकेश वानखडे, तर स्वागतपर भाषण काशिनाथ बऱ्हाटे यांनी केले.  संचालन मंगेश भुताडे यांनी केले, तर आभार प्रसेनजित तेलंग यांनी मानले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन