शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली: नागनाथ कोतापल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 17:37 IST

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले.

अमरावती : संविधानाला न बदलविता संवैधानिक मूल्यांची सरकारकडून पायमल्ली केली जात असल्याचे प्रतिपादन मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले. प्रगतिशील लेखक संघाच्या अमरावती येथील चौथ्या अधिवेशनाच्या उद्घाटनीय सत्राच्या अध्यक्षस्थानावरून कोतापल्ले रविवारी बोलत होते. त्यांच्या मते, पुरातन काळापासून या देशात ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती, असा संघर्ष सुरू आहे. 

देशात अनेकदा क्रांती आणि प्रतिक्रांती घडली आहे. १९२५ पासून देशात तीन प्रमुख विचारप्रवाह कार्यरत झाले. १९२५ मध्येच ब्राह्मणेतर काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. देशामध्ये महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समतेची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळ अशा परिवर्तनाच्या चळवळींनी देशात वाटचाल केली. त्याचवेळी देशातील सनातन, कर्मठ रुढी परंपरावादी व वर्चस्ववादी विचारांनी संघटित होण्याचे व पुरोगामी चळवळीला प्रतिकार करण्याचे काम केल्याचे कोतापल्ले म्हणाले. 

स्वातंत्र्यानंतर भारतीय संस्कृतीत व सर्वसामान्य शोषित पीडित समाजाच्या कल्याणाचा घटनेत अंर्तभाव करून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संविधानात भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब नाही व ती काहीच कामाची नाही, असे सांगून घटनेला गोधडी संबोधले होते. त्यानंतर ज्यांचा राज्यघटनेवर विश्वास नाही, अशा लोकांच्या हातात देशाची सत्तासूत्रे असल्यामुळे ते गोळवलकरांचा 'दी बंच ऑफ थॉट' यातील विचारावर आधारित भारत घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातूनच देशात सध्या विभाजनाची, असंतोषाची व अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा भारतीय फॅसिझम नव्या स्वरुपाचा असून मानव जातीला कल्याणकारी ठरणारा नाही, असे कोतापल्ले म्हणाले.   सिने अभिनेते तथा लेखक वीरा साथीदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रलेसंचे राष्ट्रीय सचिव तथा हिंदी साहित्यिक विनीत तिवारी यांनी बीजभाषण केले. यावेळी हिंदी साहित्यिक उषा आठल्ये(छत्तीसगढ) जी. के. एनापुरे, शाहीर शीतल साठे, डॉ. काशिनाथ बऱ्हाटे व्यासपीठावर उपस्थित होते. या अधिवेशनास कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे कार्यक्रमाचे समन्वयक प्रसेनजित तेलंग होते. यावेळी श्रीराम पवार (मुंबई), प्रवीण बनसोड (विदर्भ), समाधान वानखडे (मराठवाडा), दत्ता घोलप (पश्र्चिम महाराष्ट्र), संदीप पवार (कोकण) व उत्तर महाराष्ट्रातील अहवाल वाचन प्रमोद अहिरे यांनी केले. प्रास्ताविक राकेश वानखडे, तर स्वागतपर भाषण काशिनाथ बऱ्हाटे यांनी केले.  संचालन मंगेश भुताडे यांनी केले, तर आभार प्रसेनजित तेलंग यांनी मानले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन