शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

महाराष्ट्राचा जनादेश घेण्यासाठी व जनतेला हिशेब देण्यासाठी निघालोय- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 16:18 IST

आज मला आनंद होतोय की, अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून या जनादेश यात्रेला सुरुवात होतीय, मी राजनाथ सिंह यांच्या स्वागत करतो,

- सूरज दाहाट

तिवसा- आज मला आनंद होतोय की, अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतून या जनादेश यात्रेला सुरुवात होतेय, मी राजनाथ सिंह यांचे स्वागत करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. राजनाथ सिंह यांच्याच नेतृत्वात मी मुख्यमंत्री झालो, मी सगळ्यांचा जनादेश घ्यायला निघालोय व आम्ही केलेल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आता निघालो आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमरावती जिल्ह्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमी या भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.दोन किलोमीटरपासून लोकांची प्रचंड गर्दी होते, याचा मला आनंद झाला. महाराष्ट्राच्या जनतेचा आदेश या ठिकाणी प्राप्त झालाय. महाजनादेश यात्रा जनतेचा आशीर्वाद घेण्याकरिता आहे. आमचं दैवत जनता आहे. पाच वर्षे आशीर्वाद दिला, आम्ही मालक नाही सेवक आहोत. त्यामुळे आम्ही केलेलं काम पूर्ण केलं की नाही विचारायला आलोय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता दिली, महाराष्ट्रातल्या गावामध्ये जाऊन पुन्हा एकदा यात्रेची सुरुवात करतोय, महाराष्ट्रात सगळ्या समस्या संपल्या असा दावा आम्ही करत नाही, मात्र गेल्या सरकारपेक्षा आम्ही त्यापेक्षा दुप्पट काम केलीत, तुमच्यापेक्षा दुप्पट काम केली नसणार तर जनादेश घ्यायला बाहेर पडणार नाही.काँग्रेसच्या काळात कृषी पंपासाठी कनेक्शन मिळू शकल नव्हतं, त्यात दीड लाख शेतकऱ्यांना कृषी पंपाचं कनेक्शन मिळालंय, भ्रष्टाचार करून सगळा पैसा सत्ताधाऱ्यांकडे जायचा सिंचनाची प्रचंड काम आमच्या सरकारने केलीत, गोसीखुर्दमध्ये 50 हजार हेक्टरचा सिंचन पुढला टप्पा 1 लाख सिंचनाचा असणार आहे, विदर्भात विजेचे भाव 3 रुपये (इंडस्ट्रीसाठी), समृद्धी महामार्गाच काम सुरू झालं, देशातला सर्वात मोठा एक्सप्रेस महामार्ग महाराष्ट्रात, पुढल्या वर्षीच्या शेवटपर्यंत काम पूर्ण होईल, हे सरकार शेतकऱ्याच्याच पाठीशी आहे, कर्जमुक्ती, विमा, योजनांचा पैसे, दुष्काळी मदत असेल, पाच वर्षांत 50 हजार कोटींचे कर्जमाफी दिली, गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 30 हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केले, 18 हजार गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना, देशामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना दुसरीकडे नाही, चार वर्षांत 50 हजार शौचालय, हागणदारीमुक्त शहर आणि ग्रामीण केलंय, 20 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय माहामार्ग तयार केले, शिक्षणात सुधार केला, महाराष्ट्रातला शिक्षणाचा क्रमांक 16 वा होता, केवळ 3 वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आणलाय, जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढली. बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे, औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरकेंद्र सरकारने रोजगाराची निर्मिती किती झाली त्याच सर्वात मोठी आकडेवारो महाराष्ट्राची आहे, 25 टक्के रोजगार महाराष्ट्रात, आधीच्या सरकारमध्ये 3 लाख कुटुंब बचतगटाशी जोडले गेले होते, आमच्या सरकार आल्यानंतर 40 लाख कुटुंब बचत गटांशी जोडले, मोदींचे आभार पूर्वीचे मुख्यमंत्री दिल्लीत जायचे खाली हात परत यायचे, पण आम्ही जेव्हा दिल्लीत जातो तेव्हा मोदी भरभरून प्रेम आम्हाला देतात, आता हाऊसफुल झालं आहे, त्यामुळे आता प्रवेश नाही, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस