शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील ६८९ गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई, ‘जीएडीए’चा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:49 IST

राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्यात आॅगस्टनंतर पावसाने सरासरी पार केली असली तरी अमरावतीसह मराठवाडा विभागातील १४ तालुक्यांत मात्र, पाऊस माघारला. त्यामुळे ६८९ गावांमध्ये तीन मीटरपर्यंत भूजलात कमी आलेली आहे. या सर्व गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई राहणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा (जीएसडीए) राज्यातील ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेण्यात आल्यानंतर हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. पाणीटंचाईचा अहवाल मागील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आलेला आहे.राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे. या क्षेत्रात प्रचलित धोरणानुसार ३,९२० विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्याची भौगोलिकता, भूशास्त्रीय संरचना आणि दिवसेंदिवस वाढता भूजल उपसा लक्षात घेता पाणी पातळीची अचूक माहिती होण्याकरिता आता जलस्वराज प्रकल्पांतर्गत ३२ हजार ७६९ गावांतील विहिरींचा अभ्यास केल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा संभाव्य पाणीटंचाई संदर्भातील अहवाल पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना शनिवारी सादर करण्यात आला. यामध्ये १२,०१५ विहिरींच्या पाणी पातळीत तूट आढळून आली. यानुसार १२ तालुक्यांतील ३५९ गावांमध्ये जानेवारीपश्चात पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. ३३० गावांत एप्रिलपासून पाणीटंचाईचे संकट राहणार आहे.

पाणीटंचाईची कारणेपावसात खंड व यामुळे सिंचनासाठी भूजलाचा अमर्याद उपसा, सिंचनासाठी विंधन विहिरींद्वारे अतिखोल जलधारातून होणारा अतिउपसा, सिंचनासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदींमुळे भूजलात कमी आलेली आहे व त्यामुळे सदर गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.जिल्हानिहाय संभाव्य पाणीटंचाईची गावेयामध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावे, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ४७ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, राळेगाव तालुक्यात ९ गावे, यवतमाळ तालुक्यात १४ गावे तसेच मराठवाड्यात लातूर तालुक्यात ८० गावे, देवाणी तालुक्यात २२ गावे, उदगीर तालुक्यात ८५ गावे, उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात ९७ गावे, पारंडा तालुक्यात ९५ गावे, परभनी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात ७६ गावे, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात ४२ गावे व नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती