शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

राज्यातील ६८९ गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई, ‘जीएडीए’चा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:49 IST

राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : राज्यात आॅगस्टनंतर पावसाने सरासरी पार केली असली तरी अमरावतीसह मराठवाडा विभागातील १४ तालुक्यांत मात्र, पाऊस माघारला. त्यामुळे ६८९ गावांमध्ये तीन मीटरपर्यंत भूजलात कमी आलेली आहे. या सर्व गावांमध्ये डिसेंबरपश्चात पाणीटंचाई राहणार आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा (जीएसडीए) राज्यातील ३२ हजार ७६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेण्यात आल्यानंतर हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. पाणीटंचाईचा अहवाल मागील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आलेला आहे.राज्यातील भूजल संपत्तीचा अभ्यास करण्यासाठी पाच मुख्य खो-यांचे विभाजन १,५३१ पाणलोट क्षेत्रामध्ये करण्यात आलेले आहे. या क्षेत्रात प्रचलित धोरणानुसार ३,९२० विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्याची भौगोलिकता, भूशास्त्रीय संरचना आणि दिवसेंदिवस वाढता भूजल उपसा लक्षात घेता पाणी पातळीची अचूक माहिती होण्याकरिता आता जलस्वराज प्रकल्पांतर्गत ३२ हजार ७६९ गावांतील विहिरींचा अभ्यास केल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा संभाव्य पाणीटंचाई संदर्भातील अहवाल पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना शनिवारी सादर करण्यात आला. यामध्ये १२,०१५ विहिरींच्या पाणी पातळीत तूट आढळून आली. यानुसार १२ तालुक्यांतील ३५९ गावांमध्ये जानेवारीपश्चात पाणीटंचाईची झळ पोहचणार आहे. ३३० गावांत एप्रिलपासून पाणीटंचाईचे संकट राहणार आहे.

पाणीटंचाईची कारणेपावसात खंड व यामुळे सिंचनासाठी भूजलाचा अमर्याद उपसा, सिंचनासाठी विंधन विहिरींद्वारे अतिखोल जलधारातून होणारा अतिउपसा, सिंचनासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदींमुळे भूजलात कमी आलेली आहे व त्यामुळे सदर गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.जिल्हानिहाय संभाव्य पाणीटंचाईची गावेयामध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावे, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ४७ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, राळेगाव तालुक्यात ९ गावे, यवतमाळ तालुक्यात १४ गावे तसेच मराठवाड्यात लातूर तालुक्यात ८० गावे, देवाणी तालुक्यात २२ गावे, उदगीर तालुक्यात ८५ गावे, उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात ९७ गावे, पारंडा तालुक्यात ९५ गावे, परभनी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात ७६ गावे, सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात ४२ गावे व नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यातील २९ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती