शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चार प्रकल्पांची २० दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:29 IST

अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली.

ठळक मुद्देतीन नद्यांना पूर, धोतरखेड्याचा पूल पाण्याखाली : परतवाडा-चिखलदरा, अकोला मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/चांदूरबाजार/अंजनगाव सुर्जी : अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली.शहानूर प्रकल्पाची चार दारे ७.५ सेंमीने, चंद्रभागा प्रकल्पाची तीन दारे ४५ सेंमीने, पूर्णा प्रकल्पाची ९ दारे १५ सेंमीने, तर सपन प्रकल्पाची चार दारे ३० सेंमीने उघडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिली. या चारही प्रकल्पांतून अनुक्रमे २३.०८, १४१.८४, ११२.२० व ९३.२८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. तूर्तास जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्प व अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह पाच प्रकल्पांमध्ये ४३.३४ टक्के जलसंचय झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली.धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्यामुळे सपन, चंद्रभागा व शहानूर नदीला पूर आला आहे. यात सपनच्या पाण्यामुळे परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेड्याचा पूल पाण्याखाली आला आहे. सावळी दातुरा लगत सपन नदी पात्रातील वळण रस्ता खोदून काढण्यात आल्यामुळे चिखलदऱ्याकडे व अकोल्याकडे जाणारा मार्ग बंद पडला आहे. चंद्रभागा व शहानूर धरण ८८ टक्के भरले आहे. यात नद्या दुथडी वाहत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रभागा धरणाचे तीनही दरवाजे तब्बल ४५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सहायक अभियंता आर. एस. मोहिते, कनिष्ठ अभियंता ओमकार पाटील चंद्रभागा धरणावर, तर शाखा अभियंता सुमित हिरेकर शहानूर धरणावर लक्ष ठेवून आहेत. गुरूवारला मध्यरात्रीनंतर रात्री २ ते पहाटे ४ पर्यंत चंद्रभागा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला.पूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्गचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात ८२ टक्के जलसंचय झाल्याने धरणाचे संपूर्ण ९ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दरवाजे २० सेमीने उघडण्यात आली आहेत. धरणातून वाहणारे पाणी देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, थुगाव पिपरी, निंभोरा, पिंपळखुटा, तोंगलापूर, कुरळपूर्णा या गावातून वाहणाºया नदी नाल्याना मिळत असल्याने सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही, बापूजाई व सावलमेंढा या भागात पावसाचा जोर अद्यापही सुरूच आहे. तसेच चांदूर बाजार तालुक्यात सुध्दा अतिवृष्टी झाली असल्याची नोंद झाली आहे. तहसीलदार उमेश खोडके यांनी शुक्रवार सकाळपासूनच तालुक्यातील नदीकाठच्या गावाना भेटी दिल्या. धरणातील पाण्याचा विसर्ग मुळे गावांना नुकसानीचा आढावा घेतला. मात्र पाणी नदीपात्रात असल्याने कोणत्याही गावांना धोका झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. २४ तासात तालुक्यात झालेल्या पावसामुळे काही घरांची पडझड झाली आहे. याबाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Damधरणfloodपूर