शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

चार प्रकल्पांची २० दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:29 IST

अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली.

ठळक मुद्देतीन नद्यांना पूर, धोतरखेड्याचा पूल पाण्याखाली : परतवाडा-चिखलदरा, अकोला मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा/चांदूरबाजार/अंजनगाव सुर्जी : अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली.शहानूर प्रकल्पाची चार दारे ७.५ सेंमीने, चंद्रभागा प्रकल्पाची तीन दारे ४५ सेंमीने, पूर्णा प्रकल्पाची ९ दारे १५ सेंमीने, तर सपन प्रकल्पाची चार दारे ३० सेंमीने उघडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण कक्षाने दिली. या चारही प्रकल्पांतून अनुक्रमे २३.०८, १४१.८४, ११२.२० व ९३.२८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. तूर्तास जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्प व अप्पर वर्धा या मोठ्या प्रकल्पासह पाच प्रकल्पांमध्ये ४३.३४ टक्के जलसंचय झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली.धरणाचे दरवाजे उघडल्या गेल्यामुळे सपन, चंद्रभागा व शहानूर नदीला पूर आला आहे. यात सपनच्या पाण्यामुळे परतवाडा-चिखलदरा मार्गावरील धोतरखेड्याचा पूल पाण्याखाली आला आहे. सावळी दातुरा लगत सपन नदी पात्रातील वळण रस्ता खोदून काढण्यात आल्यामुळे चिखलदऱ्याकडे व अकोल्याकडे जाणारा मार्ग बंद पडला आहे. चंद्रभागा व शहानूर धरण ८८ टक्के भरले आहे. यात नद्या दुथडी वाहत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रभागा धरणाचे तीनही दरवाजे तब्बल ४५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सहायक अभियंता आर. एस. मोहिते, कनिष्ठ अभियंता ओमकार पाटील चंद्रभागा धरणावर, तर शाखा अभियंता सुमित हिरेकर शहानूर धरणावर लक्ष ठेवून आहेत. गुरूवारला मध्यरात्रीनंतर रात्री २ ते पहाटे ४ पर्यंत चंद्रभागा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला.पूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्गचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात ८२ टक्के जलसंचय झाल्याने धरणाचे संपूर्ण ९ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे दरवाजे २० सेमीने उघडण्यात आली आहेत. धरणातून वाहणारे पाणी देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, थुगाव पिपरी, निंभोरा, पिंपळखुटा, तोंगलापूर, कुरळपूर्णा या गावातून वाहणाºया नदी नाल्याना मिळत असल्याने सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही, बापूजाई व सावलमेंढा या भागात पावसाचा जोर अद्यापही सुरूच आहे. तसेच चांदूर बाजार तालुक्यात सुध्दा अतिवृष्टी झाली असल्याची नोंद झाली आहे. तहसीलदार उमेश खोडके यांनी शुक्रवार सकाळपासूनच तालुक्यातील नदीकाठच्या गावाना भेटी दिल्या. धरणातील पाण्याचा विसर्ग मुळे गावांना नुकसानीचा आढावा घेतला. मात्र पाणी नदीपात्रात असल्याने कोणत्याही गावांना धोका झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. २४ तासात तालुक्यात झालेल्या पावसामुळे काही घरांची पडझड झाली आहे. याबाबत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Damधरणfloodपूर