शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:08 PM

सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते.

ठळक मुद्देधरणात ९४ टक्के साठा : शहानूर ६८, चंद्रभागा ७६, पूर्णा प्रकल्पात ५२ टक्के जलसाठा

अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सपन प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरण ९४ टक्के भरले असून, सपन प्रकल्पस्थळी व प्रकल्पाच्या कॅचमेन्टमध्ये पाऊस सुरूच असल्यामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.शुक्रवारला रात्री ११ वाजताच्या दरम्यान धरणाचे दोन गेट उघडले होते. शनिवारी पाण्याचा येवा वाढल्याने पूर्ण दुपारी २ वाजता चारही गेट १० सेंमीमिटरने उघडल्या गेलेत. शनिवारी सकाळी ७ वाजता धरण ९३.७७ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १० सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. सकाळी सव्वानऊच्या दरम्यान धरण ९४.२८ टक्के भरल्यावरून हेच दरवाजे १५ सेंटीमिटरने उघडल्या गेलेत. धरणाऱ्या जलसाठ्यात वाढ होत गेल्यास दरवाजे आणखी उघडावे लागणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. सपन प्रकल्पस्थळी व परिसरात शुक्रवारी सायंकाळी ५ ते ९ दरम्यान ४० एमएम पाऊस पडला. सायंकाळी ९ ते सकाळी ६ पर्यंत १२० एमएम पाऊस पडला. प्रकल्पस्थळी २४ तासांत ६५ एमएम तर कॅचमेन्ट क्षेत्रात १६० एमएम पावसाची नोंद आहे.परिसरात सतत पाऊस पडत असतानाही शुक्रवारला सायंकाळी ८.३० पर्यंत कुणीही अधिकारी प्रकल्पस्थळी उपस्थित नव्हते. केवळ दोन चौकीदार परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. सायंकाळी ८.३० च्या दरम्यान आवनकर नामक कनिष्ठ अभियंता प्रकल्पस्थळी पोहचलेत. तर यानंतर १० वाजताच्या दरम्यान उपविभागीय अभियंता इंदूरकर आणि हांडे दाखल झालेत. प्राप्त माहितीनुसार हे सर्व संबंधित अधिकारी अमरावतीला त्यावेळेस उपस्थित होते.गणपती विसर्जनाकरिता धरणातील पाणी सोडण्यात यावे याकरिता अचलपूर एसडीओ व्यंकट राठोड यांनी कार्यकारी अभियंता क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून शुक्रवारलाच संपर्क साधला होता. दरम्यान सायंकाळी पावसाचे प्रमाण वाढले आणि सपन प्रकल्प ९४ टक्के भरले. यात प्रकल्प अधिकाºयांनी दरवाजे उघडलेत आणि गणेश विसर्जनाकरिता पाणी उपलब्ध झाले. गणपती पावलेत, एसडीओ व्यंकट राठोड यांची इच्छा आपोआप पूर्णत्वास गेली.अचलपूर तहसील अंतर्गत येत असलेल्या सपन प्रकल्पासह शहानूर धरण ६८ टक्के, तर चंद्रभागा धरण ७६ टक्के भरले आहे. चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्प केवळ ५२ टक्केच भरले आहे. शहानूर, चंद्रभागा, पूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याचा सध्या तरी प्रश्न नाही. धरण ९० टक्क्यांच्यावर भरतील तेव्हाच दरवाजे उघडण्याचा प्रश्न निर्माण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.