शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

साडेचार लाख शेतकरी दुष्काळग्रस्त

By admin | Updated: December 8, 2014 22:27 IST

मागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आहे. १९८६ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकरी कुटुंबांचे ७ लाख ७६ हजार

प्रचलित निकषानेच मदत : १९८६ गावांमधील ७ लाख हेक्टरपेक्षा अधिक खरीप क्षेत्र बाधितगजानन मोहोड - अमरावतीमागील वर्षी ओला दुष्काळ अनुभवलेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे आहे. १९८६ गावांमधील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकरी कुटुंबांचे ७ लाख ७६ हजार २५४ हेक्टरमधील खरिप पिके पावसाअभावी उद्ध्वस्त झाली आहेत. दरवर्षीच्या दुष्काळाच्या मालिकेने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर जगावे कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे कोलमडलेल्या जिरायती व बागायती, अल्प, अत्यल्प व कमालभूधारक शेतकऱ्यांना, बागाईतदारांना सावरण्यासाठी तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. यावर्षी जिल्ह्यातील १४ ही तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्यामुळे शासनाने आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना प्रचलित निकषांसोबत आर्थिक मदत देण्याची गरज आहे. गेल्या वर्षी खरिप हंगामात सरासरीपेक्षा १५० टक्के अधिक पाऊस, परतीचा पाऊस यामुळे खरिपाचा हंगाम गारद होऊन सरासरी ५० ते७० टक्क्यांनी उत्पादन घटले. जून महिन्यापासून पावसाने दीड महिना दडी मारली. त्यामुळे खरिपाची पेरणी २ महिने उशिरा झाली. परिणामी सोयाबीनला वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळाला नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर, शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाची दडी यामुळे ृसरासरी उत्पन्न ७० ते ८० टक्क्यांनी घटले. त्यानंतर सगळी मदार रबीवर असताना जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे हरभऱ्याची उगवण देखील ५० टक्क्यावर आली. आता तर पेरणीचा कालावधी आटोपला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सरासरी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ८६ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी झाली आहे. ही एकूण पेरणी क्षेत्राच्या ५८ टक्के आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत. आर्थिक विवंचनेतून जिल्ह्यात या वर्षात १०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी १६ शेतकरी आत्महत्या एकट्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आहेत. एकूणच शेतकऱ्यांची स्थिती विदारक असल्याचे दिसते. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ठोस उपाय व्हायला हवेत. (प्रतिनिधी)