शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

वनविभागाची लाखो हेक्टर जमीन गिळंकृत, राज्य शासनाचे अभय; वनसचिव हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 17:19 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार्यक्रमाचा अट्टाहास का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार्यक्रमाचा अट्टाहास का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे ही वनजमीन परत मिळविण्यासाठी वनसचिव हतबल झाल्याचे वास्तव आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य ३३ टक्के हिरवळमय करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याकरिता १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून राबविला जाणार आहे. त्याअनुषंगाने वनसचिव विकास खारगे हे वृक्ष लावगडीच्या नियोजनासाठी पायाला भिंगरी बांधून राज्यभर पालथे घालत आहे. जुलै महिन्यातील वृक्षारोपणासाठी जमिनींचा शोधदेखील घेतला जात आहे. यात सुमारे २० ते २५ यंत्रणांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. मात्र, राज्यात ३६ जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र हे ३०७६९० चौ.कि.मी. एवढे असून त्यात ५३४९८.०८ चौ.कि.मी. क्षेत्र पडीक आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३ नुसार राखीव वन म्हणून जाहीर करणे शक्य आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १७.३८ टक्के आहे. त्यामुळे भारतीय वननीती नुसार ३३ टक्के वनक्षेत्र होण्यासाठी ‘महसूल’च्या ताब्यात असलेली पुरेशी जमीन उपलब्ध आहे. परंतु, महसूलचे अधिकारी वनविभागाची जमीन परत करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे शासनाने ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिंनीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनिवार्य करून ४५ लाख हेक्टर वनजमिनींवर कोट्यवधींच्या संख्येने रोपवन करता येईल, हे वास्तव आहे. यापूर्वी वनसचिव विकास खारगे यांनी ‘महसूल’च्या ताब्यात असलेली वनजमीन परत मिळविण्यासाठी शासन निर्णयदेखील काढला. मात्र, दीड वर्षानंतरही ‘महसूल’ने त्यांच्या ताब्यातअसलेल्या लिजवरील वनजमीन परत करण्याचे सौजन्य दाखविले नाही. यावरून ‘महसूल’ विभागाची लॉबी ‘स्ट्राँग’ असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र