शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

वनविभागाची लाखो हेक्टर जमीन गिळंकृत, राज्य शासनाचे अभय; वनसचिव हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 17:19 IST

राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार्यक्रमाचा अट्टाहास का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

 - गणेश वासनिक 

अमरावती - राज्य शासनाचे वनयुक्त शिवार योजनेंतर्गत १ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य आहे. त्याकरिता वनविभाग रिकाम्या जमिनींचा शोध घेत आहे. मात्र, वनविभागाची ४५ लाख हेक्टर वनजमीन ‘महसूल’च्या ताब्यात असताना या जमिनींवर वृक्षारोपण कार्यक्रमाचा अट्टाहास का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे ही वनजमीन परत मिळविण्यासाठी वनसचिव हतबल झाल्याचे वास्तव आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य ३३ टक्के हिरवळमय करण्याचा ध्यास घेतला आहे. त्याकरिता १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून राबविला जाणार आहे. त्याअनुषंगाने वनसचिव विकास खारगे हे वृक्ष लावगडीच्या नियोजनासाठी पायाला भिंगरी बांधून राज्यभर पालथे घालत आहे. जुलै महिन्यातील वृक्षारोपणासाठी जमिनींचा शोधदेखील घेतला जात आहे. यात सुमारे २० ते २५ यंत्रणांना सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. मात्र, राज्यात ३६ जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्र हे ३०७६९० चौ.कि.मी. एवढे असून त्यात ५३४९८.०८ चौ.कि.मी. क्षेत्र पडीक आहे. भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३ नुसार राखीव वन म्हणून जाहीर करणे शक्य आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १७.३८ टक्के आहे. त्यामुळे भारतीय वननीती नुसार ३३ टक्के वनक्षेत्र होण्यासाठी ‘महसूल’च्या ताब्यात असलेली पुरेशी जमीन उपलब्ध आहे. परंतु, महसूलचे अधिकारी वनविभागाची जमीन परत करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे शासनाने ‘महसूल’च्या ताब्यातील वनजमिंनीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम अनिवार्य करून ४५ लाख हेक्टर वनजमिनींवर कोट्यवधींच्या संख्येने रोपवन करता येईल, हे वास्तव आहे. यापूर्वी वनसचिव विकास खारगे यांनी ‘महसूल’च्या ताब्यात असलेली वनजमीन परत मिळविण्यासाठी शासन निर्णयदेखील काढला. मात्र, दीड वर्षानंतरही ‘महसूल’ने त्यांच्या ताब्यातअसलेल्या लिजवरील वनजमीन परत करण्याचे सौजन्य दाखविले नाही. यावरून ‘महसूल’ विभागाची लॉबी ‘स्ट्राँग’ असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :forestजंगलAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र