शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

आरोपीस अटकेवेळी सर्वोच्च न्यायालयाचे सूचनांचे पालन

By admin | Updated: September 19, 2016 00:15 IST

वनेअथवा वन्यजीव गुन्ह्यांसदर्भात आरोपीस अटक करताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे.

वनविभागात प्रारंभ : मार्गदर्शक सूचना फलकाचे अनावरणअमरावती : वनेअथवा वन्यजीव गुन्ह्यांसदर्भात आरोपीस अटक करताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. याअनुषंगाने येथील वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयात शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना फलकाचे अनावरण करण्यात आले.आरोपींना अटक करतेवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन वनविभागाने करावे, यासाठी येथील कुलाकासा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. वडाळी वन कार्यालयात दर्शनी भागात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणारे फलक लावण्यात आले आहे. कुलाकासा फाऊंडेशनचे उदय् देशमुख यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड होते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. उदय देशमुख यांनी कोणत्याही गुन्ह्यात आरोपी अटक करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मात्र वनविभागात ही उणीव असल्यामुळे अनेक प्रकरणांत पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत असल्याचे दिसून येते. आरोपीस अटक व चौकशी करणाऱ्या वनाधिकाऱ्यांचे नाव, पद, हुद्दा स्पष्टपणे दिसेल, असे नामफलक गणवेशावर लावणे बंधनकारक आहे. अटक करताना पंचनामा तयार करावा. अटकेवळी कमीतकमी एक पंच जे शक्यतो आरोपींच्या कुटुंबातील असावेत. अटक पंचनाम्यात वेळ, तारीख नमूद असावी. त्यावर आरोपींची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. वनाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आणलेल्या आरोपीस त्यांचे मित्र किंवा नातेवाईक, परिचित व्यक्तीस सोबत ठेवता येईल. अटक केलेल्या आरोपीस नातेवार्इंकांना कळविणे बंधनकारक केले आहे. अटकेबाबतची नोंद डायरीमध्ये करून कोणत्या अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपविण्यात आली, हे स्पष्ट करावे लागेल. अटक करतेवेळी आरोपींचे वैद्यकीेय परीक्षण करून त्याच्या शरीरावर असणाऱ्या लहान, मोठ्या जखमांची नोद करून घ्यावी लागेल. दर ४८ तासांनंतर अटकेतील आरोपींची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. आरोपीस चौकशीवेळी वकिलांना भेटण्याची मुभा राहील. पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करून अटकेबाबतची माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.