शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर सरन्यायाधीश ‘चार्टर प्लेन’ने संभाजीनगरकडे रवाना

By गणेश वासनिक | Updated: June 27, 2025 14:24 IST

बेलोरा विमानतळावरील ‘एटीसी’कडून ‘होल्ड’: दृश्यमानता अयोग्य असल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बुधवारी अमरावतीत जाहीर सत्कार सोहळा पार पडला. गुरुवारी ते संभाजीनगरकडे जाण्याच्या तयारीत असताना ढगाळ वातावरण, पाऊस आणि दृश्यमानता अयोग्य असल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाचे ‘टेक ऑफ’ करण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, हीच स्थिती कायम असल्यास चारचाकी वाहनाने संभाजीनगर गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुपारी १ ते ३ वाजताच्या सुमारास प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली. सरन्यायाधीशांना संभाजीनगरकडे पाठविण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहने इंधनासह सुसज्ज़ केली होती. परंतु, तीन वाजता बेलोरा विमानतळ एटीसीकडून विमानाचे ‘टेक ऑफ’ करता येईल, असा निरोप आला अन् प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

दुपारी चार वाजताच्या सुमारास सरन्यायाधीश भूषण गवई हे पत्नी डॉ. तेजस्विनी, पुत्र जोतिरादित्य यांच्यासह ‘चार्टर प्लेन’ने संभाजीनगरकडे सत्कार सोहळ्यासाठी रवाना झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदींनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.

"ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ‘एटीसी’ने विमानाच्या ‘टेक ऑफ’ला असमर्थता दर्शविली. मात्र, दुपारी तीन वाजताच्या सुमारास ‘एटीसी’ने परवानगी दिली. त्यानंतर सरन्यायाधीश दुपारी चार वाजता संभाजीनगरकडे रवाना झाले. थोडीफार धावपळ झाली, पण हे रूटीन काम आहे."- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती