शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Amravati | ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दोन विद्यार्थांना उडविले, एक गंभीर जखमी

By गणेश वासनिक | Updated: September 24, 2022 17:13 IST

श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयाजवळ घडली घटना

तिवसा (अमरावती) :अमरावतीवरून नागपूरकडे समांतर वेगाने चालणाऱ्या दोन वाहनांपैकी ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने (एम एच ०४-एच.डी.९०५६) महामार्गालगत असलेल्या किराणा दुकानाला जबर धडक दिली. यावेळी लागूनच असलेल्या श्री गुरुदेव आयुर्वेद रुग्णालयातून कर्तव्य बजावून निघालेल्या व श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या  दुचाकीवर स्वार असलेल्या दोन विद्यार्थ्यांना ट्रकने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजता दरम्यान गुरूदेव नगर येथे महामार्गावर घडली.

प्राप्त माहितीनुसार महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलात सागर डेहणकर यांचे किराणा दुकान आहे. तसेच महासमाधीपासुन शंभर मीटरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण झालेले नाही. त्यामुळे रहदारीने अतिशय गजबजलेल्या व अरुंद रस्त्यावरून नियमित भरधाव वाहतूक सुरू असते. अशातच अमरावतीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने किराणा दुकानाला जबर धडक दिली. सुदैवाने दुकानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु त्याचवेळी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकणाऱ्या व दुचाकीवर (एम.एच.३६-पी-४०७१) निघालेल्या भावेश नंदू जगनाळे (२१) रा. लाखनी जि. भंडारा व वैष्णवी सुधीर नार्लेवार( २१) रा. गोंडपिंपरी जि.चंद्रपुर या दोन विद्यार्थ्यांची दुचाकी ट्रकखाली आली. त्यामुळे भावेश जगनाळे हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारार्थ अमरावती येथे पाठविण्यात आले. तर वैष्णवी नार्लेवार या विद्यार्थीनीवर येथील आयुर्वेद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी दुचाकीसह ट्रकखाली अडकलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून पोलिसांना सहकार्य केले.

घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच ट्रकचालक बाळू राजेंद्र काळे (२६) रा. बेलपुरा अमरावती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.दोन महिन्यांत चौथा अपघात

महामार्गावरील हे ठिकाण अपघातांचे प्रणव स्थळ झाले आहे.कारण येथे पादचारी रस्ताच नाही. व महामार्गालगत व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत.तसेच याच मार्गावर आयुर्वेद रुग्णालय व शाळा महाविद्यालय असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.अशावेळी भरधाव येणाऱ्या वाहनांपासुन नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.त्यामुळे आबालवृद्धांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.येथील महामार्गावर व्यवसाय थाटलेल्या व्यावसायिकांना पार्किंगचे अजीबात भान नाही.त्यामुळे महामार्गावर अस्ताव्यस्त अवैध पार्किंग हा नित्याचाच विषय झाला आहे.काही हाॅटेल व्यावसायिकांनी तर गेल्या कित्येक वर्षांपासून चक्क महामार्गच पार्कींगसाठी वापरात घेतला आहे.परंतु एवढ्या गंभीर समस्येकडे पोलिस प्रशासन व महामार्ग निर्माण आय.आर.बी.कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळे भविष्यात येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महामार्गावर असलेल्या व्यापारी संकुलाची जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हस्तांतरित केली असून संबंधितांना त्याचा मोबदला सुद्धा देण्यात आला आहे.परंतु व्यावसायिक त्याच जागेवर ठाण मांडून बसल्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.जोपर्यंत येथील व्यापारी संकुले मोकळी करून पादचारी मार्ग तयार होत नाही तोपर्यंत अपघातांची श्रृंखला अशीच चालणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीAmravatiअमरावती