यंदा दर ३० तासांत शेतकरी आत्महत्या

By Admin | Updated: September 24, 2016 01:13 IST2016-09-24T01:13:26+5:302016-09-24T01:13:26+5:30

सलगचा दुष्काळ, नापिकी व कर्ज यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी मृत्युला कवटाळत आहे. यंदा १५

Farmers' suicide every 30 hours this year | यंदा दर ३० तासांत शेतकरी आत्महत्या

यंदा दर ३० तासांत शेतकरी आत्महत्या

धक्कादायक : २५७ दिवसांत २४३ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
गजानन मोहोड ल्ल अमरावती
सलगचा दुष्काळ, नापिकी व कर्ज यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी मृत्युला कवटाळत आहे. यंदा १५ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच २५७ दिवसांत २४३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात दर तीस तासांत होणाऱ्या शेतकरी आत्महत्येचे चित्र धक्कादायक आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद १ जानेवारी २००१ पासून शासनस्तरावर घेण्यात येत आहे. तेव्हापासून १५ सप्टेंबरपर्यंत २ हजार ९४६ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार १७१ प्रकरणे पात्र ठरली व १ हजार ७३१ प्रकरणे अपात्र आहेत. तर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यातील ४४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यापूर्वी २००९ मध्ये २२० शेतकऱ्यांनी मृत्युचा फास आवळला होता. सन २०१० मध्ये २८३, सन २०११ मध्ये २५४, सन २०१२ मध्ये १९१, सन २०१३ मध्ये १६८, सन २०१४ मध्ये २०९, सन २०१५ मध्ये ३०६ व यंदा १५ सप्टेंबरपर्यंत २४३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आतापर्यंत १ हजार १७१ शेतकऱ्यांची आत्महत्याप्रकरणे पात्र ठरली आहेत. १ हजार ७३१ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात होत आहेत. त्यातही सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. सलग तीन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे मानसिक तणावात असणारा शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक चित्र जिल्ह्यात आहे.

जानेवारी, आॅगस्ट महिन्यात
दर २० तासांत आत्महत्या
४यंदाच्या जानेवारी महिन्यात ३९ व आॅगस्ट महिन्यात ३४ शेतकरीआत्महत्या झाल्या आहेत. दर वीस तासांत एका शेतकऱ्याने मृत्युचा फास आवळला आहे. मागील १५ वर्षांत सर्वाधिक ३०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यापूर्वीचा खरीप व रबी हंगाम उद्ध्वस्त झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी मरणाचा पर्याय स्वीकारत आहे.

१५ वर्षांत २,९४६
शेतकरी आत्महत्या
४जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून २ हजार ९४६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २८५ शेतकरी आत्महत्या आॅगस्ट महिन्यात झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात २२५, फेब्रुवारी २३६, मार्च २२०, एप्रिल १९०, मे २४३, जून २१३, जुलै २१५, सप्टेंबर २६३, आॅक्टोबर २३२, नोव्हेंबर २३६ व डिसेंबर महिन्यात २३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

 

Web Title: Farmers' suicide every 30 hours this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.