शेतकरी रस्त्यावर; महामार्ग धरला रोखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:27 IST2017-08-14T23:26:13+5:302017-08-14T23:27:08+5:30
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्यावतीने तब्बल दोन तास देवगावात रस्ता रोको करण्यात आला़ ...

शेतकरी रस्त्यावर; महामार्ग धरला रोखून
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्यावतीने तब्बल दोन तास देवगावात रस्ता रोको करण्यात आला़ दरम्यान अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यासह शेकाडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर त्यांची सुटका केली़
शासनाने शेतकºयांना दिलेली कर्ज माफी ही फसवी असून संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्यावतीने आ़बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सकाळी १० वाजता औरंगाबाद-नागपूर या महामार्गाच्या देवगाव चौफुलीवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ दरम्यान दोन्ही बाजूच्या वाहतुकीची तब्बल ४ किलोमीटर पर्यंत वाहनाची रीघ लागली होती़
या आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे, अमर ठाकरे, तेजस धुर्वे, दिलीप गावंडे, विशाल सावरकर, सर्फराज पठाण, राहुल लांबाडे, अतुल नागमोते, संदीप ठावरे, मंगेश सोनेवने, मुकुंद कोल्हे, नितीन चव्हाण, गजानन निमकर, सचिन झोड, अवधूत डबळे या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता़
दर्यापुरात सुकाणू समिती आक्रमक
दर्यापूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सुकाणू समिती, प्रहार संघटना व शेतकºयांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी चक्का जाम केला. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. शेतकºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार अमोल कुंभार यांना दिले. यावेळी महेश कुरडकर, दिनेश म्हाला, बापूसाहेब साबळे, नमीत हुतके, सुधीर पवित्रकार, पप्पू गावंडे, दत्ता कुभारकर, प्रवीण कावरे, अक्षय साखरे, गजानन डीके, गणेश लखडे उपस्थित होते.
शिंगणापूर येथे रास्ता रोको
नांदगाव खंडेश्वर : अमरावती-यवतमाळ व नागपूर-औरगांबाद या मार्गावरील शिंगणापूर येथे सुकाणू समितीच्यावतीने रास्तारोको करण्यात आला. यावेळी दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. तुकाराम भस्मे, सुनील मेटेकर, संतोष सुरजुसे, पंडितराव ढोके, श्याम शिंदे, पुरुषोत्तम टापरे, भानुदास मदुरकर, गणेश अवझाडे, विशाल शिंदे, नरेश दवस, अंकुश शिंदे, इंद्रिस भाई, रशीद भाई, अ. मोहसीन, प्रकाश उडबगळे, मोरेश्वर वंजारी, विनोद तºहेकर, नारायण भगवे, प्रफुल्ल देशमुख आदी उपस्थित होते.
सिंभोरा चौकाला पोलीस छावणीचे स्वरूप
मोर्शी : स्थानिक सिंभोर चौकाला सुकाणू समितीच्या वतीने पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुकाणू समितीचे कार्यकर्ते व शेतकरी यांनी एकत्र येत अमरावती मार्ग रोखून धरला. यामुळे शहरातून बाहेर जाणारी व शहरात येणारी वाहतूक अवरुद्ध झाली. मोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यावेळी नगरसेवक नईम खान, दद्दू महाराज, इनाम भाई, मंजूषा खांडेकर, पिंटू बोबडे, रुपेश वाळके, गजानन काळे, विजय पाथरे यांनी तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांना निवेदन दिले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
प्रहार, किसान सभेचा चक्काजाम
परतवाडा : रास्ता रोको आंदोलनामुळे अमरावती-परतवाडा मार्गावर सुमारे तीन तास वाहतूक खोळंबली होती. आंदोलनाचे नेतृत्व प्रहारचे बल्लू जवंजाळ, गजानन भोरे, प्रशांत आवारे, दीपक भोरे, मंगेश हुड, संजय तट्टे, अंकुश जवंजाळ, भास्कर मसूदकर, संजय उगले, प्रवीण पाटील, श्याम अग्रवाल, अविनाश सुरजे, दीपक धुळधर, विजय थावाणी, वंटी काकराणीया, साहेबराव महरे, किसान सभेचे नामदेवराव बदरके, शहाने, धनंजय म्हस्के, याकुब पठाण, संजय शेटे, बंडू इंदूरकर, बाबूराव दांडगे, प्रकाश सांगोळे, शंकरराव तणपुरे, महादेव जाधव आदी उपस्थित होते. तीन तास वाहतूक खोळंबल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. तर आंदोलनामुळे शिक्षक व शासकीय कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचू शकले नाहीत.
चांदूररेल्वेत शेतकरी आक्रमक
चांदूररेल्वे : स्थानिक विरुळ चौकात सकाळी १० वाजतापासूनच सुकाणू समिती व किसान सभेचे कार्यकर्ते एकत्र होत होते. त्यांनी अमरावती मार्ग रोखून धरला. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांनी मोर्चा सांभाळून आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. यानंतर आंदोलनाचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी कॉ. विनोद जोशी, रामदास कारेमोरे, किसान सभेचे देवीदास राऊत, नितीन गवळी आदी उपस्थित होते.
अमरावतीत रोखला राज्यमार्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी दुपारी रहाटगाव चौकात प्रहारसह विविध संघटनांनी चक्काजाम आंदोलन करून वाहतूक अडवून धरली. नांदगाव पेठ पोलिसांनी ५० ते ६० आंदोलनकर्त्यांना 'डिटेन' केले.
प्रहारचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू व जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वात शेकडो आंदोलनकर्त्यांनी दोन्ही बाजूने रस्ता अडवून धरला होता. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेने सोमवारी जिल्ह्याभरात आवाज बुंलद केला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, सीआयटीयू संघटना, संभाजी ब्रिगेड, सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. आंदोलनकर्ते छोटू महाराज वसू व प्रदीप वडतकर यांच्यासह गजेंद्र मोहोड, चंदू खेडकर, गजानन भुगूल, राहुल ठाकरे, पिंटू सोळंके, इल्फाज अहमद, सुधीर उगले, नितीन दिवाण, अमोल कावलकर, जोगेश्वर मोहोड, शेख अमजद, लोकेश म्हाला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी नागपूर हायवेवरील रहाटगाव चौकात रस्त्यावर ठिय्या देऊन शेतकºयांची मागणी बुलंद केली.
आंदोलनकर्त्यांनी दोन्ही बाजूचे रस्ते अडवून धरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनानेही वेळेवर आंदोलनकर्त्यांना रोखण्याचे प्रयत्न केले. सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे यांच्यासह पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय व अन्य पोलीस ताफ्याने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यावर कारवाई करून त्यांची सुटका करण्यात आली.
मुंडन करून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : शेतकºयांना सरसकट कर्जमाफी केल्याचा बणाव करीत फसवणूक केल्याचा आरोप सुकाणू समितीने केला. दरम्यान चक्काजाम आंदोलन छडले आहे. याचे पडसाद चांदूर बाजार तालुक्यातही दिसून आले. भाविक पोहकार, नंदू विघ्ने यांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदविला. प्रहारने अमरावती-परतवाडा मार्गावर झाडे आडवी टाकून वाहतूक रोखून धरली. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, दीपक भोंगाडे, मुन्ना बोंडे, गणेश पुरोहित, निखिल ठाकरे, गोलू ठाकूर, शिशिर माकोडे, मुज्जफर हुसैन, प्रदीप बंड, समीर मेश्राम यांच्यासह शक डो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी मार्गावर टायर जाळून वाहतूक खोळंबवण्यात आली.
बेलोरा येथे सकाळी साडेसात वाजतापासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. तुषार पावडे, भैय्या ठाकरे, श्याम कडू, सचिन पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांनी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. याशिवाय वणी ग्रामपंचायतचे सरपंच सूरज चव्हाण, संजू ठाकरे, पिंटू अलोणे, निखिल बागडे, गोलू राऊत यांचाही सहभाग होता.