शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:52 IST

रब्बी हंगाम; जमिनीत आर्द्रतेचा अभाव, पेरणीवर मोठा असर

अमरावती : रब्बी हंगामात दरवर्षीच तेलबिया पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. आतापर्यंत फक्त १३२२ हेक्टर क्षेत्रात गळीत धान्याची पेरणी झालेली आहे. बाजारातील अनिश्चितता, पक्ष्यांचा त्रास व सिंचनास पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने या पिकांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रब्बीत गहू व हरभरा या दोन पिकांकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी अमरावती विभागात ७.४६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत १७ नोव्हेंबरपर्यंत १.८८ लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २५ टक्केवारी आहे. महिनाभरापासून रब्बी हंगाम सुरू झाला असताना पेरणीचा टक्का वाढत नसल्याने चिंता वाढली आहे. यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर पावसाळ्यात १२ तालुक्यात पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही. याशिवाय ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने जमिनीत आर्द्रता नाही व पुनर्भरण न झाल्याने भूजलस्तरात कमी आलेली आहे. याचा थेट असर रब्बीच्या पेरणीवर झालेला आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे १५ ते २० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत फक्त हरभरा १.६६ लाख हेक्टर व गव्हाची १५०३७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

जवस, तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्र निरंक

विभागातील ७.४६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत करडई १०३९ हेक्टर, मोहरी २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. याशिवाय सूर्यफूल ७ हेक्टर, जवस २ हेक्टर तर तिळाचे क्षेत्र निरंक आहे. ऐन हंगामात बाजारात पडणारे भाव, आवकच नसल्याने मागणीत घट व करडईच्या हंगामात मजुरांची कमतरता यामुळे गळीत धान्याचे पेरणीक्षेत्र कमी होत आहे.

काही वर्षात करडई, सूर्यफुलाचे क्षेत्रात घट झाली आहे. तेलबियांचे क्षेत्र वाढावे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीWheatगहूAmravatiअमरावती