शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:52 IST

रब्बी हंगाम; जमिनीत आर्द्रतेचा अभाव, पेरणीवर मोठा असर

अमरावती : रब्बी हंगामात दरवर्षीच तेलबिया पिकांचे क्षेत्र कमी होत आहे. आतापर्यंत फक्त १३२२ हेक्टर क्षेत्रात गळीत धान्याची पेरणी झालेली आहे. बाजारातील अनिश्चितता, पक्ष्यांचा त्रास व सिंचनास पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने या पिकांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रब्बीत गहू व हरभरा या दोन पिकांकडेच शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी अमरावती विभागात ७.४६ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत १७ नोव्हेंबरपर्यंत १.८८ लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही २५ टक्केवारी आहे. महिनाभरापासून रब्बी हंगाम सुरू झाला असताना पेरणीचा टक्का वाढत नसल्याने चिंता वाढली आहे. यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर पावसाळ्यात १२ तालुक्यात पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही. याशिवाय ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने जमिनीत आर्द्रता नाही व पुनर्भरण न झाल्याने भूजलस्तरात कमी आलेली आहे. याचा थेट असर रब्बीच्या पेरणीवर झालेला आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे १५ ते २० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत फक्त हरभरा १.६६ लाख हेक्टर व गव्हाची १५०३७ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे.

जवस, तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्र निरंक

विभागातील ७.४६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत करडई १०३९ हेक्टर, मोहरी २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. याशिवाय सूर्यफूल ७ हेक्टर, जवस २ हेक्टर तर तिळाचे क्षेत्र निरंक आहे. ऐन हंगामात बाजारात पडणारे भाव, आवकच नसल्याने मागणीत घट व करडईच्या हंगामात मजुरांची कमतरता यामुळे गळीत धान्याचे पेरणीक्षेत्र कमी होत आहे.

काही वर्षात करडई, सूर्यफुलाचे क्षेत्रात घट झाली आहे. तेलबियांचे क्षेत्र वाढावे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीWheatगहूAmravatiअमरावती