शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कोरोना व्हायरसच्या संकटात सापडला शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 5:00 AM

मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकºयांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले.

ठळक मुद्देआर्थिक व्यवहार ठप्प, खासगी बाजारात भाव पडले, खरेदीदार गावाकडे फिरकेना

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शेतकऱ्यांना कधी आस्मानी, तर कधी सुल्तानी संकटांना तोंड द्यावे लागते. त्याचे अवघे आयुष्य संघर्ष करण्यातच जात आहे. यंदा पिकांची अवस्था चांगली असताना व बाजार समित्यांमध्ये माल विक्री जोरात सुरू असताना कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली.मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकरी गहू, हरभरा आदी शेतमाल काढण्याच्या कामात व्यस्त होते. काही शेतकऱ्यांनी संवगणी करून ठेवलेली होती, तर काही कापण्यासाठी तयार होता. दुसरीकडे बाजार समित्यांवरही लॉकडाऊनचा परिणाम दिसत असल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद केल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नव्हती. परिणामी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे सरकारने शेतीसंबंधित व्यवसाय व व्यवहार सुरू ठेवण्यास परवाणगी दिली आहे. नोंदणीशिवाय शेतमालाची विक्री करणे शक्य नाही.मोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाची आवक थोडी वाढली असून, शनिवार, १८ एप्रिल रोजी तालुक्यातील निकड असलेल्या शेतकऱ्यांनी मालाची विक्री होईल व आपल्या हातात पैसा येईल, या आशेने शेतमाल यार्डात आणून टाकला. शनिवारी बाजार समितीत हरभरा ४५६ क्विंटल आला असून, त्याला भाव ३७०० ते ४९३५ रुपये तूर, ८७५ क्विंटल पाच हजार ते ५३५० रुपये भाव. सोयाबीन २५ क्विंटल दर ३५०० ते ३६२५ गहू ११२ क्विंटल भाव १५०० ते १७५० प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सांगितले. मात्र, कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये झालेली गर्दी अनेकांसाठी धोक्याची ठरण्याचीही शक्यता आहे. यावर बाजार समितीने पुढाकार घ्यावा, असे शेतकरी बोलत होते. अनेक शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या कुटुंबाची आणि शेतात राबणाºया मजुरांच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.शेतमालाला योग्य भाव हवेबाजार समित्या धोका पत्करण्यास तयार नाहीत अशी अवस्था दिसून येत आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव देणे आवश्यक आहे. हा काळ अडचणीचा आहे, सरकारवर आरोग्य व्यवस्थेपासून ते नागरिकांच्या जीवाची व कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी आहे. देशातील कृषी साखळी ही मजबूत असून बाजार समित्या त्यात मोठा दुवा आहे, या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी