शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

शेतकऱ्याचा मृत्यू; जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व गावकºयांनी घेतल्याने खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी दालनासमोरील आत्महत्येचे प्रकरण : आश्वासनानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतल्याने खळबळ उडाली होती. मात्र, शेतकरी आत्महत्येसंदर्भात शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशा जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनंतर नातेवाईक व गावकºयांनी शवविच्छेदनास सहमती दर्शविली.समृद्धी महामार्गासाठी शेतातच होत असल्याने शेताचे मोजमाप झाल्याशिवाय खोदकाम करू नका, या रास्त मागणीचे निवेदन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील रहिवासी अनिल महादेव चौधरी (४५) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वीच सादर केले होते. तरीही गुरुवारी तलावातील खोदकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या अनिल चौधरी यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांच्या मागणीचे समाधान झाले नाही. त्यामुळे अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी दालनासमोरच विष प्राशन केले. गाडगेनगर पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरून नातेवाइकांसह गावकऱ्यांनी इर्विन रुग्णालयात धाव घेतली. सर्वांच्या संतप्त भावना होत्या. अनिल चौधरी यांच्या रास्त मागण्या मान्य करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने खळबळ उडाली. हा मुद्दा रेटून धरल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी इर्विन रुग्णालयात येऊन चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर नातेवाईक व गावकऱ्यांनी अनिल चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सहमती दर्शविली.समृद्धी महामार्गासाठी मनमानी पद्धतीने अवैध उत्खनन सुरू आहे. त्यांनी दलाल पेरले. अधिकारी सहभागी झाले आहेत. चौधरींच्या तक्रारीची दखल यापूर्वीच घेतली असती, तर त्यांचे प्राण वाचले असते. हा ‘समृद्धी’चाच बळी आहे.- वीरेंद्र जगतापआमदार, चांदूर रेल्वेशेतकरी कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार केला जाईल. शेतकरी आत्महत्येसंदर्भात मिळणाºया मदतीसाठी प्रस्ताव पाठविला जाईल. याबाबत सकारात्मक प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन नातेवाइकांना दिले आहे.- विवेक घोडके उपजिल्हाधिकारीगावकऱ्यांचा आधारवड गेलाअत्यंत मनमिळावू स्वभावाचे अनिल चौधरी हे सर्वांसाठी कोणत्याही वेळी धावून जायचे. तालुक्यात कुठेही काही घडल्यास ते सांत्वन देण्यासाठी पोहोचायचे. स्वत:च्या कुटुंबाचा विचार न करता, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धडपडत असत. गावात येणारा कोणतेही राजकीय किंवा शासकीय पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करायचे. त्यांच्या रूपाने कुटुंबीयांसह गावकऱ्यांचा आधारवड गेल्याची खंत नातेवाईक व गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री लोहगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे अंत्यसंस्कार पार पडले. याप्रसंगी मावसभाऊ देवानंद चौधरी, पुतण्या चेतन चौधरी, प्रकाश चौधरी यांच्यासह मित्रपरिवारातील अवि भगत, गजान ठाकरे, डॉ. मनोहरे, छोटू मुंदे, सचिन रिठे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा गौरव, मुली वेदिका व सानिका आहेत.आत्महत्येपूर्वी मित्राशी फोनवर संवादअनिल चौधरी यांचा सर्वात जवळचे मित्र अरविंद भगत यांना मोबाइलवर गुरुवारी दुपारी २ वाजता कॉल आला. शेत धरणात गेले, मी समृद्धीला विकले नाही. माझी परवानगी न घेता शेतात खोदकाम सुरु होते. त्यामुळे मी रोखण्यासाठी गेलो. पोलीस आले, त्यांनी हाकलून दिले. कलेक्टर आॅफीसला गेलो. ते लंचसाठी गेले. त्यानंतर मला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, असे संभाषण अनिल यांनी केले. मानवधर्म निभविणारा मित्र आमच्यातून निघून गेला. त्याच्या बलिदानाचे सार्थक व्हायला हवे, अशी गावकºयांची मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या ठरावाचा बळीजिल्हा परिषदेच्या व्यवस्थापन समितीने १५ मे रोजी ठराव घेतला. गावतलावाचा गाळ काढण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले. यासाठी त्यांनी गावतलावालगतच्या सर्व शेतकऱ्यांची परवानगी घ्यायला हवी होती, मात्र, कोणालाही न विचारता आचारसंहितेत हा ठराव घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ठरावाचा अनिल चौधरी हा बळी गेला आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रवींद्र मुंदे यांनी केला.चुलतभावाची मध्यस्थीअनिल चौधरी यांचे चुलतभाऊ पुरुषोत्तम चौधरी यांनी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले विवेक घोडके यांच्याशी चर्चा केली. शासनाकडून शेतकरी आत्महत्येविषयी दिल्या जाणाऱ्या मदतीसाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन घोडके यांनी पुरुषोत्तम चौधरी यांना दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू