शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

वरूडचा शेतकरी घेतो वर्षाला पंधरा लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

वांगी, टोमॅटो, मिर्ची पिकाला प्राधान्य, साडेचार एकरांत यशाची शेतीवरूड : स्थानिक ४८ वर्षीय शेतकऱ्याने व्यवसायापेक्षा शेतीला महत्त्व देऊन आधुनिक ...

वांगी, टोमॅटो, मिर्ची पिकाला प्राधान्य, साडेचार एकरांत यशाची शेतीवरूड : स्थानिक ४८ वर्षीय शेतकऱ्याने व्यवसायापेक्षा शेतीला महत्त्व देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सावंगा शेतशिवारात असलेल्या साडेचार एकर शेतीतून एक वर्षात पंधरा लाख रुपयांचे उत्पादन काढतो. यामध्ये संत्र्यापेक्षा वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, कारली ही पालेभाज्या पिके घेऊन उत्पादन काढले जाते. शेती करताना वेळेचे महत्त्व जाणून मशागतीपासून तर लागवड आणि उत्पादनापर्यंत काळजी घेऊन लाखो रुपयांचे उत्पादन काढून शेती फायदेशीर कशी असते, हे दाखवून दिले.

वरूड येथील शेतकरी हरिभाऊ विघे यांचे मालकीचे मौज सावंगा शेतशिवारात साडेसात एकर शेत असून, वाहितीमध्ये साडेचार एकर आहे. यात संत्रा झाडेसुद्धा आहे. परंतु, संत्र्यापेक्षा पालेभाज्या पिकांना महत्त्व देऊन वांगी, टोमॅटो, मिरची, काकडी, कारली ही पालेभाज्यांची पिके हरिभाऊ विघे घेतात. प्रत्येकाचे क्षेत्र वेगळे असते. पाऊण एकरात वांगी असून, ती आतापर्यंत दोन लाख रुपये देऊन गेली. एक एकरातील मिरची तीन लाखांत गेली. काकडीचे एक एकरात चार लाखांचे पीक झाले. अर्धा एकरात दीड लाख रुपयांची कारली आणि एक लाख रुपये असे उत्पादन घेतले आणि तेही खरीप हंगामातील सह महिन्यांत. रबी हंगामातसुद्धा त्याच जागेवर उन्हाळी टोमॅटो आणि काकडीची लागवड करून तीन ते चार लाख रुपयांचे उत्पादन काढत असल्याचे हरिभाऊ सांगतात. वेळेचे भान, वातावरणीय बदल व बाजारपेठेच्या अंदाज घेऊन शेती केल्यास शेतीमध्ये फायदाच होतो, असे ते सांगतात.

मल्चिंगचा शीटचा वापर

मल्चिंग शीटचा वापर करून रोपे लावली जातात. यामुळे निंदण करावे लागत नाही. संत्र्यापेक्षा हंगामी पिके घेतल्यास अधिक फायदा मिळत असल्याचे सांगतात .

शेतीव्यवसाय फायद्याचाच

संत्र्याचे मशागतीवर अवाढव्य खर्च करूनसुद्धा वेळेवर भाव मिळत नाही. म्हणून मी जीवनाश्यक पिके घेतली.यात ३५ टक्के खर्च होतो, तर ६५ टक्के निव्वळ नफा मिळतो, हा यशाचा मंत्र शेतकरी हरिभाऊ विघे यांनी दिला.