शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या; राज्यात ग्राफ वाढताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:28 IST

Amravati : शासन-प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळविण्यास शेतकरी स्वावलंबी मिशनदेखील कुचकामी ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन-प्रशासन गंभीर नसल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात २०० वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळविण्यास शेतकरी स्वावलंबी मिशनदेखील कुचकामी ठरले आहे. त्यामुळे हे सर्व शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.

जिल्ह्यात यंदा ११ महिन्यांत तब्बल १८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. नैसर्गिक आपत्ती, नापिकी, बँकांसह सावकाराचे कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहे. सत्ता कोणाचीही असली तरी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकात थांबलेले नाही, किंबहुना यामध्ये वाढ होत आहे. वर्ष २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यांत ५,५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. शासन-प्रशासन शेतकरी आत्महत्या विषयात गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. मात्र, मिशनद्वारा ठोस उपाययोजना नसल्याने शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळालेले नाही.

२००१ पासून शेतकरी आत्महत्या

शेतकरी आत्महत्या - ५,५५७शासन मदतीस पात्र - २,९१८शासन मदतीत अपात्र - २५४७चौकशीसाठी प्रलंबित - ९२

दोन दशकांपासून शासन मदतीत वाढ नाही

शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारास १९ डिसेंबर २००५ च्या शासनादेशानुसार फक्त एक लाखाची मदत दिली जाते. यात ३० हजारांचा धनाकर्ष, तर ७० हजारांची मुदत ठेव तहसीलदार व वारस यांच्या संयुक्त नावे ठेवली जाते. या मदतीमध्ये तब्बल २० वर्षात शासनाने वाढ केलेली नाही. सात-बारावरील बोजा कायम असल्याने त्यांना कोणताही लाभ मिळत नाही.

२०२५ मधील शेतकरी आत्महत्या

यंदाच्या ११ महिन्यांत तब्बल १८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ११, फेब्रुवारी १०, मार्च १६, एप्रिल १६, मे २५, जून २०, जुलै १६, ऑगस्ट २१, सप्टेंबर १७, ऑक्टोबर १७ व नोव्हेंबर महिन्यात १२ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ४९ प्रकरणे पात्र, ४० अपात्र, तर ९२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Amaravati Sees Over 200 Farmer Suicides; State Graph Worsens

Web Summary : Over 200 farmers in Amaravati died by suicide this year due to crop failure, debt, and lack of effective government support. Despite initiatives, farmer suicides continue to rise, with thousands recorded since 2001. Financial aid remains stagnant, failing to alleviate the crisis.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती