शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 14, 2025 20:06 IST

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो, असे वादग्रस्त वक्तव्य माध्यमांशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी येथे केले. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राज्यात चांगलेच पडसाद उमटले आहे.

ना. कोकाटे जिल्हा कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यासाठी अमरावतीला आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पीक विम्यासंदर्भात असे वक्तव्य केले. ते म्हणाले एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. अन्य राज्यातील लोकांनी यामध्ये अर्ज केले.

याबाबत चौकशी केली असताना लक्षात आल्याने चार लाख अर्ज रद्द करण्यात आले. कुठे तरी सीएससी केंद्रवाले असे काही उद्योग करीत असावे, असा माझा संशय आहे. काही जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे ना. कोकाटे म्हणाले. वक्तव्यादरम्यान कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केल्याचा आरोप आता विरोधकांद्वारे केल्या जात आहे. त्यामुळे ना. कोकाटे यांचे हे वादग्रस्त वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.जबाबदारीने बोलावे, भाजपचा सल्लाशेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उल्लेख आदरानेच व्हायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी कृषिमंत्र्यांना दिला आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या वक्तव्यावर चांगलेच संतापले, ते म्हणाले शेतकऱ्याला आपण अन्नदाता संबोधतो. त्यांना भिकाऱ्याची उपमा देणे योग्य नाही, सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते करते का, असा सवाल त्यांनी केला तर लोकभावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी कृषिमंत्र्यांना दिला.

शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषिमंत्र्यांची हिंमत कशी होते?- काँग्रेस

एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरले. एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू, माझ्या वक्तव्याचा विर्पयास केला गेला.- माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस