शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 14, 2025 20:06 IST

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो, असे वादग्रस्त वक्तव्य माध्यमांशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी येथे केले. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राज्यात चांगलेच पडसाद उमटले आहे.

ना. कोकाटे जिल्हा कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यासाठी अमरावतीला आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पीक विम्यासंदर्भात असे वक्तव्य केले. ते म्हणाले एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. अन्य राज्यातील लोकांनी यामध्ये अर्ज केले.

याबाबत चौकशी केली असताना लक्षात आल्याने चार लाख अर्ज रद्द करण्यात आले. कुठे तरी सीएससी केंद्रवाले असे काही उद्योग करीत असावे, असा माझा संशय आहे. काही जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे ना. कोकाटे म्हणाले. वक्तव्यादरम्यान कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केल्याचा आरोप आता विरोधकांद्वारे केल्या जात आहे. त्यामुळे ना. कोकाटे यांचे हे वादग्रस्त वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.जबाबदारीने बोलावे, भाजपचा सल्लाशेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उल्लेख आदरानेच व्हायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी कृषिमंत्र्यांना दिला आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या वक्तव्यावर चांगलेच संतापले, ते म्हणाले शेतकऱ्याला आपण अन्नदाता संबोधतो. त्यांना भिकाऱ्याची उपमा देणे योग्य नाही, सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते करते का, असा सवाल त्यांनी केला तर लोकभावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी कृषिमंत्र्यांना दिला.

शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषिमंत्र्यांची हिंमत कशी होते?- काँग्रेस

एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरले. एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू, माझ्या वक्तव्याचा विर्पयास केला गेला.- माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस