शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 10:28 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.

ठळक मुद्देवनरक्षक स्वाती हुमने यांच्या एक्झिटनंतर प्रगणना ठप्प

गणेश वासनिक

अमरावती :विदर्भातील व्याघ्र प्रकल्प काही कारणास्तव रखडलेली वन्यजीवांची प्रगणना केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी वन्यजीवांची प्रगणना होऊ न शकल्याने जंगल आणि व्याघ्र प्रकल्पात नेमके वन्यजीवांची संख्या किती ही आकडेवारी वनविभागाकडे अद्यापही उपलब्ध होऊ शकली नाही.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना करताना २० नोव्हेंबर २०२१ रोजी वनरक्षक स्वाती हुमने यांच्यावर वाघाने हल्ला करून फरफटत नेले आणि तिला ठार केले होते. या घटनेनंतर तोकड्या वन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जंगलात वन्यजीवांची प्रगणना धोकादायक असल्याचा आक्षेप घेत ती बंद पाडली. त्यानंतर विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना रखडली आहे. परंतु, आता वन्यजीव विभागाने रखडलेली वन्यजीवांची प्रगणना नव्याने आरंभण्याची तयारी केली आहे.

मात्र, सन २०२१ मध्ये मुंबई, मराठवाडा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागात व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना आटोपली असून, डेटा मात्र वरिष्ठांकडे पाठविला नाही, अशी माहिती आहे. तथपि, विदर्भात सर्वाधिक जंगल, व्याघ्र प्रकल्प असून, येथीलच वन्यजीवांची प्रगणना रखडल्याने वन्यजीवांचा डेटा गोळा करण्यात अडथळे निर्माण होत आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.

डेहराडून येथे पाठविला जाते माहिती

वन्यजीवांची प्रगणना प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात चार वर्षातून एकदा करण्यात येते तसेच व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी केली जाते. परिणामी व्याघ्र प्रकल्पात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना आता येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. प्रगणनेची माहिती गोळा करुन ती डेहराडून येथील वन्यजीव विभागांकडे पाठविली जाते. हा डेटा एकत्र केला जातो. त्यानंतर डेहराडून वन्यजीव विभाग यात काही सुधारणा करुन जंगल, वन्यप्राण्यांची आकडेवारी, सविस्तर मागदर्शक तत्त्वे जारी करते.

विदर्भात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. काही भागांत प्रगणना झाली असून, ज्या भागांत काही कारणास्तव थांबलेली प्रगणना आता नव्याने केली जाणार आहे. लवकरच प्रगणनेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.

टॅग्स :Tigerवाघenvironmentपर्यावरणAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भwildlifeवन्यजीव