शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 10:28 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.

ठळक मुद्देवनरक्षक स्वाती हुमने यांच्या एक्झिटनंतर प्रगणना ठप्प

गणेश वासनिक

अमरावती :विदर्भातील व्याघ्र प्रकल्प काही कारणास्तव रखडलेली वन्यजीवांची प्रगणना केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी वन्यजीवांची प्रगणना होऊ न शकल्याने जंगल आणि व्याघ्र प्रकल्पात नेमके वन्यजीवांची संख्या किती ही आकडेवारी वनविभागाकडे अद्यापही उपलब्ध होऊ शकली नाही.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना करताना २० नोव्हेंबर २०२१ रोजी वनरक्षक स्वाती हुमने यांच्यावर वाघाने हल्ला करून फरफटत नेले आणि तिला ठार केले होते. या घटनेनंतर तोकड्या वन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जंगलात वन्यजीवांची प्रगणना धोकादायक असल्याचा आक्षेप घेत ती बंद पाडली. त्यानंतर विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना रखडली आहे. परंतु, आता वन्यजीव विभागाने रखडलेली वन्यजीवांची प्रगणना नव्याने आरंभण्याची तयारी केली आहे.

मात्र, सन २०२१ मध्ये मुंबई, मराठवाडा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागात व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना आटोपली असून, डेटा मात्र वरिष्ठांकडे पाठविला नाही, अशी माहिती आहे. तथपि, विदर्भात सर्वाधिक जंगल, व्याघ्र प्रकल्प असून, येथीलच वन्यजीवांची प्रगणना रखडल्याने वन्यजीवांचा डेटा गोळा करण्यात अडथळे निर्माण होत आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.

डेहराडून येथे पाठविला जाते माहिती

वन्यजीवांची प्रगणना प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात चार वर्षातून एकदा करण्यात येते तसेच व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी केली जाते. परिणामी व्याघ्र प्रकल्पात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना आता येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. प्रगणनेची माहिती गोळा करुन ती डेहराडून येथील वन्यजीव विभागांकडे पाठविली जाते. हा डेटा एकत्र केला जातो. त्यानंतर डेहराडून वन्यजीव विभाग यात काही सुधारणा करुन जंगल, वन्यप्राण्यांची आकडेवारी, सविस्तर मागदर्शक तत्त्वे जारी करते.

विदर्भात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. काही भागांत प्रगणना झाली असून, ज्या भागांत काही कारणास्तव थांबलेली प्रगणना आता नव्याने केली जाणार आहे. लवकरच प्रगणनेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.

टॅग्स :Tigerवाघenvironmentपर्यावरणAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भwildlifeवन्यजीव