शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 10:28 IST

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.

ठळक मुद्देवनरक्षक स्वाती हुमने यांच्या एक्झिटनंतर प्रगणना ठप्प

गणेश वासनिक

अमरावती :विदर्भातील व्याघ्र प्रकल्प काही कारणास्तव रखडलेली वन्यजीवांची प्रगणना केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी वन्यजीवांची प्रगणना होऊ न शकल्याने जंगल आणि व्याघ्र प्रकल्पात नेमके वन्यजीवांची संख्या किती ही आकडेवारी वनविभागाकडे अद्यापही उपलब्ध होऊ शकली नाही.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना करताना २० नोव्हेंबर २०२१ रोजी वनरक्षक स्वाती हुमने यांच्यावर वाघाने हल्ला करून फरफटत नेले आणि तिला ठार केले होते. या घटनेनंतर तोकड्या वन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जंगलात वन्यजीवांची प्रगणना धोकादायक असल्याचा आक्षेप घेत ती बंद पाडली. त्यानंतर विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना रखडली आहे. परंतु, आता वन्यजीव विभागाने रखडलेली वन्यजीवांची प्रगणना नव्याने आरंभण्याची तयारी केली आहे.

मात्र, सन २०२१ मध्ये मुंबई, मराठवाडा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागात व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना आटोपली असून, डेटा मात्र वरिष्ठांकडे पाठविला नाही, अशी माहिती आहे. तथपि, विदर्भात सर्वाधिक जंगल, व्याघ्र प्रकल्प असून, येथीलच वन्यजीवांची प्रगणना रखडल्याने वन्यजीवांचा डेटा गोळा करण्यात अडथळे निर्माण होत आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.

डेहराडून येथे पाठविला जाते माहिती

वन्यजीवांची प्रगणना प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात चार वर्षातून एकदा करण्यात येते तसेच व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी केली जाते. परिणामी व्याघ्र प्रकल्पात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना आता येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. प्रगणनेची माहिती गोळा करुन ती डेहराडून येथील वन्यजीव विभागांकडे पाठविली जाते. हा डेटा एकत्र केला जातो. त्यानंतर डेहराडून वन्यजीव विभाग यात काही सुधारणा करुन जंगल, वन्यप्राण्यांची आकडेवारी, सविस्तर मागदर्शक तत्त्वे जारी करते.

विदर्भात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. काही भागांत प्रगणना झाली असून, ज्या भागांत काही कारणास्तव थांबलेली प्रगणना आता नव्याने केली जाणार आहे. लवकरच प्रगणनेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.

टॅग्स :Tigerवाघenvironmentपर्यावरणAmravatiअमरावतीVidarbhaविदर्भwildlifeवन्यजीव