शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पालिका आयुक्तांवर शाई फेक; कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 17:27 IST

अमरावतीत मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याच्या निषेधार्त महानगरपालिका कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाद्वारा महिलांद्वारे आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करीत असल्याचे मनपा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी सांगितले. अग्निशमन विभाग व सुरू असलेले आरोग्य केंद्र वगळता मुख्यालय व पाचही झोनच्या एक हजारांवर कर्मचारी मनपा गेटसमोर एकवटले व कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी एकदिवसाचे कामबंद आंदोलन सुरू केले.

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण चिघळले आहे. शहरातील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर दोन महिलांनी शाई फेकल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवि राणा यांच्या नेतृत्त्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ जानेवारी रोजी बसविण्यात आला होता. मात्र, तो प्रशासनाने रात्रीतून उचलल्याने राजकीय वाद विकोपाला गेला. त्याच अनुषंगाने काही महिलांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याची ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिघळलेल्या स्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेचा निषेध नोंदवत महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

हे कृत्य अमरावतीच्या संस्कृतीला शोभनीय नाही. ज्यांनी काेणी केले असेल, त्यांच्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे. झालेल्या प्रकरणाचा मी जाहीर निषेध करतो.

चेतन गावंडे, महापौर 

अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही

महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर करण्यात येणारे असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला. बुधवारी शहरातील राजापेठ उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर काही समाजकंटकांनी काळी शाई फेकल्याचे वृत्त माझ्या निदर्शनास आले. निवडणुकांच्या तोंडावर शहरातील वातावरण अशांत करण्याचा आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. मात्र अमरावतीकर याला बळी पडणार नाहीत. शांतता आणि सलोखा कदापीही भंग होणार नाही, असा आपणास विश्वास असल्याचे ना. ठाकूर यांनी म्हटले आहे.

- ना. यशोमती ठाकूर

टॅग्स :agitationआंदोलनAmravatiअमरावतीPoliceपोलिसcommissionerआयुक्तEmployeeकर्मचारी