शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जात वैधता’अभावी ६०० सरपंच, सदस्यांवर गंडांतर ५४२ ग्रामपंचायतींची निवडणूक,

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 17:42 IST

निवडून आल्यावर एक वर्षाच्या आता जात वैधता प्रमाणपत्र देणे संबंधित सरपंच, सदस्यांना बंधनकारक आहे.

गजानन मोहोड

अमरावती : निवडून आल्यावर एक वर्षाच्या आता जात वैधता प्रमाणपत्र देणे संबंधित सरपंच, सदस्यांना बंधनकारक आहे; मात्र जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ५४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल ५९८ सरपंच, सदस्यांनी अद्याप प्रमाणपत्र दिलेले नाही. विशेष म्हणजे या सदस्यांना कोरोना संसर्गामुळे एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता संपुष्टात आल्याने जिल्हा प्रशासनाद्वारा नोटीस बजावण्यात येत आहे.

जिल्ह्यात जानेवारी २०२१ मध्ये ५४२ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. यामध्ये ४८६७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी २९३१ राखीव प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गात २२८६ उमेदवारांनी विहीत कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांना सादर केलेले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली होती व शासकीय कामकाज प्रभावित झाले होते. त्यामुळे विहित १८ जानेवारी २०२२ या कालावधीपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बहुतांश उमेदवारांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे शासनाद्वारा यासाठी पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती व ही मुदतदेखील १७ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात आलेली आहे.