शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतात वापरण्यात येणा-या रासायनिक पदार्थांचा त्वचेवर परिणाम, कंटाळून शेतक-याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 13:21 IST

रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे.

बेनोडा शहीद (अमरावती) - रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे.  विजय मडावी (वय 55 वर्ष)असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्वचारोगाला कंटाळून त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्वचारोगने त्रस्त होते.  धक्कादायक बाब म्हणजे शेतात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांचा विजय मडावी यांच्या त्वचेवर परिणाम झाला असावा, अशी चर्चा संपूर्ण परिसरात आहे. यालाच कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचंही बोलले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  लोणी ते आलोडा रोडवरील प्रभाकर पाटील यांच्या शेताजवळ विजयचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विजयचे हात व पाय त्वचारोगामुळे सुजले होते. अनेक इलाज करुन ते थकले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेतात काम करताना त्यांना त्वचारोग उद्भवला. या आजारामुळे ते त्रासले होते. आजारापणालाच कंटाळून वडिलांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचा जबाब त्यांचा मुलगा विपुल याने पोलिसांना दिला. पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, पीएसआय भरत लसंते यांचे मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल राजू धुर्वे व त्यांचे पथक करत आहेत.

यवतमाळमध्ये फवारणीचे १८ बळी, ‘त्या’ शेतक-यांच्या मृत्यूची चौकशी

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यांत १८ शेतक-यांचा बळी गेला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिवांकडून चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. पीडित कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांची मदत सरकारने जाहीर केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘सेफ्टी किट’ वितरित करण्याचे बंधन कीटकनाशक कंपन्यांवर घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. विमा योजनेसाठी अपात्र किंवा तांत्रिक कारणाने विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. फवारणीबाबत कृषी विभागातर्फे जनजागरण मोहीम हाती घेण्यात येईल.विषबाधा प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला आहे. फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालणार आहे. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

टॅग्स :Farmerशेतकरी