शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
3
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
4
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
5
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
6
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
7
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
8
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
9
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
10
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
11
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
12
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
13
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
14
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
15
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
16
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
17
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
18
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
19
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
20
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
Daily Top 2Weekly Top 5

अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:41 IST

पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे. ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण संचय पातळीच्या निम्म्यावर असणारा जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. सलग चार वर्षांपासून नापिकीच्या झळा सोसणाºया वºहाडात दरदिवशी तीन शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पश्चिम विदर्भात पावसाच्या चार महिन्यात ७७८ मिमी सरासरी अपेक्षित असताना ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीइतका, तर अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, १० आॅगस्टपासून ४५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने किमान १० लाख हेक्टरमधील सोयाबीन, ६० हजार हेक्टरवरील मूग व ५० हजार हेक्टरवरील उडिदाचे पीक जागीच करपले. सहा लाख हेक्टरमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही असल्याने कपाशीचे सरासरी उत्पादन किमान ४० टक्क्यांनी घटणार आहे. भूजल पातळीदेखील खोल गेल्याने सध्या बुलडाणा जिल्ह्यात आठ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. 

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या २५० दिवसांत ७५० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २२१ शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. बहुधा यंदा राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. अमरावती १६५, अकोला ९६, यवतमाळ १४८, वाशिम ५७ व वर्धा जिल्ह्यात ६३ शेतकºयांनी आत्महत्या केली.

अडीच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफी  योजनेसाठी विभागातील ९ लाख ७२ हजार १३७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केलेत. १५ महिन्यांच्या अवधीत ७ लाख ११ हजार ६९८ शेतकºयांना ३६१४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. अद्याप २ लाख ६० हजार ४३९ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

५३६० कोटींचे वाटप रखडलेयंदाच्या खरिपासाठी विभागातील बँकांना ८२६३ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. ३० सप्टेंबरला खरीप हंगामाचे कर्जवाटप संपले. बँकांनी  ३ लाख ९० हजार १९६ शेतकºयांना २९०३ कोटींचे वाटप केले, तर तब्बल ५३६० कोटींचे वाटप झालेले आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची स्थिती गंभीरविभागातील ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण जलसंचय पातळीच्या तुलनेत ६३ टक्के साठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये ६० टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पांमध्ये ६३ टक्केच साठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती