शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:41 IST

पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे. ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण संचय पातळीच्या निम्म्यावर असणारा जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. सलग चार वर्षांपासून नापिकीच्या झळा सोसणाºया वºहाडात दरदिवशी तीन शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पश्चिम विदर्भात पावसाच्या चार महिन्यात ७७८ मिमी सरासरी अपेक्षित असताना ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीइतका, तर अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, १० आॅगस्टपासून ४५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने किमान १० लाख हेक्टरमधील सोयाबीन, ६० हजार हेक्टरवरील मूग व ५० हजार हेक्टरवरील उडिदाचे पीक जागीच करपले. सहा लाख हेक्टरमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही असल्याने कपाशीचे सरासरी उत्पादन किमान ४० टक्क्यांनी घटणार आहे. भूजल पातळीदेखील खोल गेल्याने सध्या बुलडाणा जिल्ह्यात आठ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. 

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या २५० दिवसांत ७५० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २२१ शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. बहुधा यंदा राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. अमरावती १६५, अकोला ९६, यवतमाळ १४८, वाशिम ५७ व वर्धा जिल्ह्यात ६३ शेतकºयांनी आत्महत्या केली.

अडीच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफी  योजनेसाठी विभागातील ९ लाख ७२ हजार १३७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केलेत. १५ महिन्यांच्या अवधीत ७ लाख ११ हजार ६९८ शेतकºयांना ३६१४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. अद्याप २ लाख ६० हजार ४३९ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

५३६० कोटींचे वाटप रखडलेयंदाच्या खरिपासाठी विभागातील बँकांना ८२६३ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. ३० सप्टेंबरला खरीप हंगामाचे कर्जवाटप संपले. बँकांनी  ३ लाख ९० हजार १९६ शेतकºयांना २९०३ कोटींचे वाटप केले, तर तब्बल ५३६० कोटींचे वाटप झालेले आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची स्थिती गंभीरविभागातील ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण जलसंचय पातळीच्या तुलनेत ६३ टक्के साठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये ६० टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पांमध्ये ६३ टक्केच साठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती