शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:41 IST

पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे. ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण संचय पातळीच्या निम्म्यावर असणारा जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. सलग चार वर्षांपासून नापिकीच्या झळा सोसणाºया वºहाडात दरदिवशी तीन शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पश्चिम विदर्भात पावसाच्या चार महिन्यात ७७८ मिमी सरासरी अपेक्षित असताना ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीइतका, तर अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, १० आॅगस्टपासून ४५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने किमान १० लाख हेक्टरमधील सोयाबीन, ६० हजार हेक्टरवरील मूग व ५० हजार हेक्टरवरील उडिदाचे पीक जागीच करपले. सहा लाख हेक्टरमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही असल्याने कपाशीचे सरासरी उत्पादन किमान ४० टक्क्यांनी घटणार आहे. भूजल पातळीदेखील खोल गेल्याने सध्या बुलडाणा जिल्ह्यात आठ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. 

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या २५० दिवसांत ७५० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २२१ शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. बहुधा यंदा राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. अमरावती १६५, अकोला ९६, यवतमाळ १४८, वाशिम ५७ व वर्धा जिल्ह्यात ६३ शेतकºयांनी आत्महत्या केली.

अडीच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफी  योजनेसाठी विभागातील ९ लाख ७२ हजार १३७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केलेत. १५ महिन्यांच्या अवधीत ७ लाख ११ हजार ६९८ शेतकºयांना ३६१४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. अद्याप २ लाख ६० हजार ४३९ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

५३६० कोटींचे वाटप रखडलेयंदाच्या खरिपासाठी विभागातील बँकांना ८२६३ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. ३० सप्टेंबरला खरीप हंगामाचे कर्जवाटप संपले. बँकांनी  ३ लाख ९० हजार १९६ शेतकºयांना २९०३ कोटींचे वाटप केले, तर तब्बल ५३६० कोटींचे वाटप झालेले आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची स्थिती गंभीरविभागातील ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण जलसंचय पातळीच्या तुलनेत ६३ टक्के साठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये ६० टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पांमध्ये ६३ टक्केच साठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती